शिवसेनेचे 'मिशन मुंबई महापालिका'

कडोंमपा, उल्हासनगरमध्ये भाजपला ‘चेकमेट’ करण्याचा डाव


ठाणे/ कल्याण/ उल्हासनगर : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या स्पर्धेचा परिणाम एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांवरही दिसू लागला आहे. मुंबईचे महापौरपद मिळाले नाही, तर कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये शिवसेनेकडून भाजपला 'चेकमेट' करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.


ठाण्यातही महापौरपदावरून ताण:


ठाणे महानगरपालिकेत शिंदे सेनेने ७५ जागा जिंकत एकहाती बहुमत मिळवले आहे, तर भाजपला केवळ २८ जागांवर समाधान मानावे लागले. तरीही भाजपकडून ठाण्यात किमान दोन वर्षांसाठी महापौरपदाची मागणी होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईनंतर आता ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्येही भाजप-शिवसेना यांच्यात महापौरपदावरून संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.


कल्याण-डोंबिवलीत स्वतंत्र डावपेच?


कडोंमपामध्ये एकूण १२२ नगरसेवक असून शिवसेनेचे ५३, तर भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले आहेत. युतीत निवडणूक लढवूनही दोन्ही पक्षांतील संख्याबळात फारसा फरक नसल्याने भाजपकडून सत्तेत समसमान वाटपाची मागणी होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना महापौरपद व प्रमुख पदे सोडण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्याकडून इतर पक्षांच्या नगरसेवकांशी संपर्क वाढवण्यात येत असल्याची चर्चा असून, उबाठातील एका नगरसेवकाच्या भेटीने राजकीय वातावरण तापले आहे.


उल्हासनगरमध्ये वंचितसोबत युतीची शक्यता :


उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपचे ३७, तर शिंदे गटाचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. अंबरनाथप्रमाणे येथेही शिंदे गट भाजपला डावलून वेगळी सत्ता स्थापन करू शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंब्याचे पत्र दिल्याची माहिती असून, त्यामुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर