वाडा-भिवंडी-मनोर महामार्गाची दुरवस्था

ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते खिळखिळे, प्रशासन सुस्त


वाडा : वाडा-भिवंडी-मनोर या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महामार्गावर नियमबाह्य वजन वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांनी उच्छाद मांडला आहे. क्षमतेपेक्षा तिप्पट-चौपट ओझे लादलेले ३० ते ४० टनांचे ट्रक आणि कंटेनर या मार्गावरून बेधडक धावत असल्याने सर्वसामान्यांचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. प्रशासनाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या या 'ओव्हरलोड' साम्राज्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिक दहशतीच्या छायेखाली
वावरत आहेत.


हा महामार्ग प्रामुख्याने ग्रामीण भागातील दळणवळणासाठी असून त्याची क्षमता साधारण ८ ते १२ टन वजनासाठी आहे. मात्र, औद्योगिक क्षेत्रातील अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या डंपर आणि कंटेनरनी या रस्त्याची वाट लावली आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता असूनही सततच्या प्रचंड वजनामुळे रस्ता जागोजागी खचला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. अरुंद रस्ता आणि त्यात हे अवजड 'राक्षस' यामुळे दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वाहने केवळ क्षमतेपेक्षा जास्त वजनच भरत नाहीत, तर वेगमर्यादेचेही उल्लंघन करत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी बेकायदेशीर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रात्रीच्या अंधारात भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाहनांमुळे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. "अपघात झाला की पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग धाव घेतात, काही वेळ तपासणीचे नाटक होते आणि पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होते, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभाग या ओव्हरलोड वाहनांवर ठोस कारवाई का करत नाही? असा सवाल आता विचारला जात आहे. कारवाई केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर ओव्हरलोड वाहतुकीवर तातडीने नियंत्रण मिळवले नाही आणि रस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर भविष्यात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक