स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान


मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सरकारमधील महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला आणि त्यांचे तीन नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असल्याने या तीन नगरसेवकांची मते आपल्याला मिळतील अशाप्रकारची धारणा महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेची असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्र्वादी काँग्रेस (शप) तसेच समाजवादी पक्ष येत एक स्वतंत्र गट स्थापन करत आहेत.त्यामुळे अशाप्रकारे गट केल्यास त्यांचाही एक सदस्य विविध समित्यांवर जावू शकतो आणि प्रसंगी या गटातील सदस्य परिस्थितीनुसार कुणाच्याही बाजूने मतदान करू शकतात असे चित्र बोलले जात आहे.


मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची तसेच त्यांच्या गटांची नोंदणी प्रक्रिया सुरु असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शपचा एक आणि समाजवादी पक्षाचे दोन अशाप्रकारे सहा नगरसेवक आहेत. यासर्वांची स्वतंत्र नगरसेवक म्हणून नोंदणी न करता एक गट म्हणून तिन्ही पक्षांची नोंदणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीकोनातून हालचाली सुरु आहेत. जर स्वतंत्र नगरसेवकांची नोंदणी झाल्यास या तिन्ही पक्षातील नगरसेवकांना स्वतंत्रपणे बसावे लागणार आहे तसेच त्यांना कोणत्याही समितीमध्ये स्थान मिळणार नाही. त्यातुलनेत तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी गट केल्यास महत्वाच्या समित्यांमध्ये प्रत्येक एक एक सदस्य जावू शकतो.


राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ सईदा खान, बुशरा मलिक,आयेश शम्स खान हे तिन नगरसेवक निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रसे (शप) पक्षाने उबाठा आणि मनसेने आघाडीमध्ये निवडणूक लढवली आहे. या पक्षाच्यावतीने अजित रावराणे हे एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत. तर समाजवादी पक्षाच्यावतीने अमरीन शेहजाद अब्राहनी आणि इरम साजिद अहमद सिद्दीकी हे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षाच्यावतीने गट करून प्रत्येक समित्यांमध्ये प्रत्येकी एक नगरसेवकांची वर्णी लावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.


विशेष म्हणजे राष्ट्रवादी कांग्रेस हा सरकारमधील महायुतीतील घटक पक्ष असल्याने त्यांचे तीन नगरसेवकांसोबत भाजप तसेच शिवसेना यांची एकत्र येत गट स्थापन केला असता तरी विविध समित्यांमध्ये महायुतीचे संख्याबळ वाढू शकते. तसेच शिवसेना आणि भाजप यांचाही गट केल्यास त्यांचे संख्या बळ वाढू शकते. मात्र गट केल्यास पाच वर्षांतील बांधिलकी कायम राहणार असून एकच गट असल्याने या गटाचा प्रमुख नेता असलेल्याचा व्हिप पाळणे सर्व सदस्यांवर बंधनकारक राहणार आहे. त्यामुळेच सर्व पक्ष स्वतंत्र गट तयार करून अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.


दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र


मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडून शरद पवार हे उबाठा आणि मनसेसोबत गेले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढली. परंतु आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईत एकत्र येण्याची चिन्हे असून गट करत हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक असल्यामुळे या पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ सईदा खान या गटनेत्या होवू शकतात,असे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची