मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठा प्रकल्प, बोरिवली–विरार पट्ट्यात रेल्वे स्थानकांचा कायापालट

मुंबई : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या पायाभूत बदलांचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. बोरिवली ते विरारदरम्यान रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या मार्गावर धावणार असून, गर्दी आणि विलंब कमी होण्याची अपेक्षा आहे.


कांदिवली ते बोरिवलीदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेने पुढील टप्प्याला सुरुवात केली आहे. सुमारे २६ किलोमीटरच्या या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि पुनर्रचना केली जाणार आहे. या कामासाठी आतापर्यंत विविध टप्प्यांमध्ये वाहतूक ब्लॉक्स घेण्यात आले होते.



२१८४ कोटींचा खर्च, २०२८ पर्यंत पूर्ण होणार प्रकल्प


या संपूर्ण योजनेसाठी अंदाजे २१८४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. विद्यमान मार्गिकांच्या पश्चिम बाजूला दोन नवीन रेल्वे ट्रॅक उभारले जाणार आहेत. यासोबतच तीन मोठे पूल, १६ लहान पूल आणि एक नवीन भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे.


वसई खाडीवरील महत्त्वाचे पूल क्रमांक ७३ आणि ७४ या प्रकल्पाचा भाग असून, त्यातील एका पुलाच्या पायाभरणीचे काम सुरू झाले आहे. तर भाईंदर परिसरातील जुना आणि जीर्ण झालेला ऐतिहासिक पूल हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



या स्थानकांमध्ये मोठे बदल


भाईंदर आणि वसई रोड स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले जाणार आहेत. नव्या प्लॅटफॉर्मची उभारणी, सध्याच्या फलाटांचा पुनर्वापर आणि प्रवाशांच्या हालचाली सोप्या व्हाव्यात यासाठी रचना बदलली जाणार आहे. दहिसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा आणि विरार या स्थानकांवरही सुधारणा केल्या जाणार आहेत.


दहिसरचे प्लॅटफॉर्म उत्तरेकडे, भाईंदरचे पश्चिम दिशेला तर विरारचे प्लॅटफॉर्म थोडेसे दक्षिणेकडे हलवले जाणार आहेत. या बदलांमुळे स्थानकांतील गर्दी कमी होईल आणि गाड्यांच्या थांबण्याचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.



प्रवाशांना काय फायदा होणार?


या प्रकल्पामुळे उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतील. परिणामी वेळापत्रक अधिक शिस्तबद्ध होईल, विलंब कमी होतील आणि रोजच्या प्रवासात मुंबईकरांना दिलासा मिळेल. पश्चिम रेल्वेवरील हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील रेल्वे प्रवास अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य