Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीचा जल्लोष! काकड आरतीने सुरुवात; गायन, वादन, २२ जानेवारीला निघणार भव्य रथ शोभायात्रा

मुंबई : प्रभादेवीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त भव्य 'माघ श्री गणेश जयंती महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी येणाऱ्या मुख्य गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर, आज (सोमवार, १९ जानेवारी) पासूनच या महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. रविवार, २५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात मुंबईकरांना भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. महोत्सवाच्या सातही दिवसांत मंदिरातील वातावरण चैतन्यमय असणार आहे. दररोज पहाटे ५.०० ते ५.३० या वेळेत होणाऱ्या मंगलमय काकड आरतीने धार्मिक विधींची सुरुवात होईल. त्यानंतर दिवसभर अभिषेक, महानैवेद्य आणि भक्तांसाठी नमस्कार विधी पार पडणार आहेत. गणेश जयंतीच्या मुख्य दिवशी (२२ जानेवारी) मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले असून भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता न्यासाने चोख नियोजन केले आहे.



नामवंत कलाकारांची उपस्थिती


या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे दररोज सायंकाळी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम. यामध्ये देशभरातील नामांकित कलाकार आपली कला सादर करणार आहेत. शास्त्रीय गायन, वाद्यसंगीत, शास्त्रीय नृत्य आणि पारंपारिक लोकनृत्य अशा विविध कलाप्रकारांनी मंदिराचा परिसर भक्तीमय होणार आहे. भजनांच्या सुरावटींमुळे भाविकांना अध्यात्मिक अनुभूती घेता येईल.



विविध कलाकारांचे सादरीकरण


सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध तालवादक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते शिवमणी यांचे सादरीकरण होणार आहे. मंगळवारी बासरीवादनाचे ज्येष्ठ कलाकार पंडित राकेश चौरसिया यांची बासरी मैफल होईल. त्याच संध्याकाळी ओडिसी नृत्यप्रकाराचे सादरीकरणही होणार आहे. बुधवारी प्रसिद्ध सतारवादक पंडित निलाद्री कुमार यांचा सतारवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच रघुनाथ फडके यांचे गीत रामायण सादरीकरणही होणार आहे.



२२ जानेवारीला निघणार भव्य रथ शोभायात्रा


या महोत्सवाचा मुख्य सोहळा २२ जानेवारी रोजी संपन्न होणार असून, त्या दिवशी दुपारी ३.०० वाजता काढण्यात येणारी 'भव्य रथ शोभायात्रा' हे आकर्षणाचे प्रमुख केंद्र असणार आहे. बाप्पाच्या या पालखी सोहळ्यासाठी प्रभादेवी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. धार्मिक विधींसोबतच हा महोत्सव जागतिक दर्जाच्या शास्त्रीय संगीतानेही सजणार आहे.


शुक्रवार, २३ जानेवारी: या दिवशी पद्मश्री पुरस्कार विजेते जगप्रसिद्ध तबलावादक विजय घाटे आपल्या तबल्याच्या तालावर भक्तांना मंत्रमुग्ध करतील.


शनिवार, २४ जानेवारी : सुप्रसिद्ध तबलावादक पंडित आदित्य कल्याणकर यांच्या तबलावादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि भक्तीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.


उत्सवादरम्यान होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी चोख नियोजन केले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बाप्पाचे दर्शन सुलभतेने घेता यावे, यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे वयोवृद्ध भाविकांना गर्दीचा त्रास न होता शांततेत दर्शन घेता येईल. माघी गणेश जयंतीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर परिसर भक्तीमय सुरावटींनी न्हाऊन निघणार आहे. रथ शोभायात्रेतील ढोल-ताशांचा गजर आणि त्यानंतर होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींमुळे हा आठवडा भाविकांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे. "बाप्पाच्या आशीर्वादाने हा महोत्सव संस्कृती जपणारा आणि भक्तांना आनंद देणारा ठरेल," असा विश्वास मंदिर व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच