शिवसेनेने अडीच वर्षांकरीता महापौरपद मागितले ही अफवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; स्पष्ट जनादेशानंतर वादविवाद जनतेला आवडणार नाही


मुंबई : मुंबईच्या महापौर पदावरून भाजप-शिवसेनेत आलबेल नसल्याची चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर रोखठोक भाष्य केले आहे. “शिवसेनेने अडीच वर्षांकरीता महापौरपद मागितल्याच्या चर्चा या अफवा आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणुका लढविल्या आहेत. दावोस येथील परिषदेनंतर जेव्हा मी मुंबईला जाईन, तेव्हा आम्ही एकत्र बसून महापौर पदाबाबत निर्णय घेऊ. कोण महापौर होणार किंवा कोणाला कोणते पद मिळणार, अशा विषयात महायुतीत कोणताही संघर्ष अथवा वाद नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ते दावोसला रवाना झाले. महापालिका निकालांत विशेषतः मुंबईत भाजप आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, निकालानंतर शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याने, महापौर पदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दावोस येथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौर पदाबाबत भाष्य केले.


उद्धव ठाकरे आणि तुमच्यात चर्चा सुरू झाल्या आहेत का, या प्रश्नावर या सर्व वावड्या आणि अफवा आहेत. ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आमची महायुती भक्कम आहे. महापौर पद किंवा इतर छोट्यामोठ्या पदांसाठी भांडत बसणार नाही. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आहे. असा जनादेश मिळाल्यानंतर पदांसाठी भांडत बसणे योग्य नाही, लोकांना ते आवडणार नाही. त्यामुळे आम्ही ते करणारही नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.



जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार


मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीत जनतेने भाजप आणि महायुतीला मोठे यश दिले. त्यामुळे आता ट्रिपल इंजिनासोबत ट्रिपल जबाबदारी वाढल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखविली. जनतेचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारातून हा विश्वास सार्थ करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात