रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘


मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने भारतात जिंकलेली ही पहिलीच एकदिवसीय सामन्याची मालिका आहे. २०२७च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारताकडे १८ एकदिवसीय सामनेच आहेत आणि त्यापैकी ३ सामने झाले. या मालिकेतील पराभवामुळे भारताच्या वर्ल्ड कप तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय सामन्याची मालिका जिंकली होती, तरीही त्यांना किवींविरुद्ध समाधानकारक कामगिरी करता आली नाही.


मागच्यावेळेस ऑस्ट्रेलियाने भारतात एकदिवसीय सामन्याची मालिका २-१ अशी जिंकली होती. रोहित शर्माला सलामीला आलेले अपयश, रवींद्र जडेजाची निराशाजनक कामगिरी आणि मधल्या फळीती सातत्य नसणे, यामुळे भारतीय संघाला ही मालिका गमवावी लागली.


रोहितला पॉवर प्लेमध्ये अपयश : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला संघाला अपेक्षित सुरुवात करून देता आली नाही. त्याला तीन सामन्यांत २०.३३ च्या सरासरीने फक्त ६१ धावा करता आल्या. २६ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. रोहितच्या अपयशामुळे मधल्याफळीवर दडपण वाढले आणि तिसऱ्या व निर्णायक सामन्यात भारताने पटापट विकेट्स गमावल्या.


रवींद्र जडेजाने केले निराश : भारताचा यशस्वी अष्टपैलूंपैकी एक रवींद्र जडेजाने या मालिकेत दोन्ही आघाड्यांवर निराश केले. तिसऱ्या सामन्यात त्याने ६ षटकांत ४१ धावा दिल्या. विशेष म्हणजे ३ सामन्यांत मिळून त्याने फक्त ४३ धावा केल्या. त्याने पहिल्या दोन सामन्यांत गोलंदाजीत ४४ व ५६ धावा देताना एकही विकेट घेतली नाही. तेच फलंदाजीत त्याने २७ व ४ धावांचे योगदान दिले.


मधल्या फळीमध्ये गोंधळ : लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करण्यात अपयश आले. बिनबाद २८ वरून भारताची अवस्था पुढील ९ षटकांत ४ बाद ७१ अशी झाली. अय्यरने ३ सामन्यांत २० च्या सरासरीने ६० धावा केल्या, तर लोकेशने ३ सामन्यांत एका शतकासह १४२ धावा केल्या.

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला