राजकीय फोडाफोडी; उबाठाचे नितीन खंबायत श्री मलंगगडच्या जंगलात ?

नऊ जण सुरक्षित; उबाठातर्फे दोन नगरसेवकांना नोटीस; कारवाईचा इशारा


कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) उबाठाचे नगरसेवक फोडण्याचे काम सुरू केले आहे. उबाठातील दोन नगरसेवक शिवसेनेच्या (शिंदे गट) संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. फोडाफोडीपासून दूर कल्याण पू.मधील उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक नितीन खंबायत श्री मलंगगड परिसरातील जंगलात लपून बसल्याची खळबळजनक चर्चा रंगली आहे. दरम्यान उबाठाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दोघांनाही नोटीस दिली आहे. उद्या पक्षाच्या गट स्थापनेकच्या बैठकीस उपस्थित राहावे, अन्यथा पक्ष विरोधी काम केल्याने पक्षाकडून कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.


कडोंमपाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह खा. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उबाठाच्या नगरसेविका ॲड. कीर्ती ढोणे यांनीही खा. श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याने खळबळ उडाली. या घडामोडींमुळे उबाठासह भाजपमध्येही तीव्र नाराजी आहे.


कल्याणमधील शिवसेनेचे (शिंदे गट) काही मातब्बर नगरसेवक स्वतःच्या प्रभागात पराभूत झाले असताना, त्यांच्या विजयासाठी ताकद लावण्याऐवजी फोडाफोडीवर भर दिला जात असल्याची टीका होत आहे. कल्याण पू. येथील नितीन खंबायत हे उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. त्यांना शिवसेनेत(शिंदे गट) सामील करून घेण्यासाठी दोन दिवसांपासून सतत दबाव टाकला जात असल्याचा आरोप उबाठाडून होत आहे. पक्षांतर बंदी कायद्याची चिंता करू नका, आम्ही सर्व बघून घेऊ, असे सांगण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान, उबाठाचे कल्याण लोकसभा जिल्हा संघटक अभिजीत सावंत यांनी नऊ नगरसेवक सुरक्षित असल्याचा दावा करत ते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत असे सांगितले.

Comments
Add Comment

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक