महाराष्ट्राच्या तरुणाने न्यूझीलंडमध्ये घोडेस्वारीची शर्यत जिंकली

पंढरपूर : कान्हापुरी (ता. पंढरपूर) येथील राहुल रघुनाथ भारती या तरुणाने न्युझीलंडमध्ये ‘हार्स रेसिंग स्पर्धेत’ तब्बल २५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. ग्रामीण भागातील या तरुणाने सातासमुद्रापलीकडे जाऊन भारताचा डंका पेटला आहे. रेसिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती मिळताच येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.


अवघ्या ३२ वर्षांच्या राहुल भारती या तरुणाला लहानपणापासूनच घोड्याच्या रेसिंग स्पर्धेविषयी खूप आकर्षण होते. पुणे येथे त्यांनी काही वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर थेट न्युझीलंड गाठले. महाराष्ट्रात जसे बैलगाडी शर्यतीला मानाचे स्थान आहे. तसेच न्यूझीलंडमध्ये हॉर्स रेसिंग स्पर्धेला मोठी प्रतिष्ठा आहे.


हीच संधी साधून राहुल भारती या तरुणाने न्यूझीलंडमध्ये आपल्यातील कलागुण सिद्ध करून दाखवले आहेत. राहुल भारती यांचे वडील हे शेतकरी असून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये राहुल याने न्युझीलंडमध्ये जाऊन हॉर्स रेसिंग स्पर्धेत भारताचे नाव रोशन केले आहे. अलीकडेच न्यूझीलंडमध्ये हॉर्स रेसिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये राहुल याने तब्बल २५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. त्याच्या या यशाची माहिती मिळताच कान्हापुरी गावामध्ये आनंदाला उधाण आले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार