महाराष्ट्राच्या तरुणाने न्यूझीलंडमध्ये घोडेस्वारीची शर्यत जिंकली

पंढरपूर : कान्हापुरी (ता. पंढरपूर) येथील राहुल रघुनाथ भारती या तरुणाने न्युझीलंडमध्ये ‘हार्स रेसिंग स्पर्धेत’ तब्बल २५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. ग्रामीण भागातील या तरुणाने सातासमुद्रापलीकडे जाऊन भारताचा डंका पेटला आहे. रेसिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती मिळताच येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.


अवघ्या ३२ वर्षांच्या राहुल भारती या तरुणाला लहानपणापासूनच घोड्याच्या रेसिंग स्पर्धेविषयी खूप आकर्षण होते. पुणे येथे त्यांनी काही वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर थेट न्युझीलंड गाठले. महाराष्ट्रात जसे बैलगाडी शर्यतीला मानाचे स्थान आहे. तसेच न्यूझीलंडमध्ये हॉर्स रेसिंग स्पर्धेला मोठी प्रतिष्ठा आहे.


हीच संधी साधून राहुल भारती या तरुणाने न्यूझीलंडमध्ये आपल्यातील कलागुण सिद्ध करून दाखवले आहेत. राहुल भारती यांचे वडील हे शेतकरी असून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये राहुल याने न्युझीलंडमध्ये जाऊन हॉर्स रेसिंग स्पर्धेत भारताचे नाव रोशन केले आहे. अलीकडेच न्यूझीलंडमध्ये हॉर्स रेसिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये राहुल याने तब्बल २५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. त्याच्या या यशाची माहिती मिळताच कान्हापुरी गावामध्ये आनंदाला उधाण आले आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे