२ ब मार्गिकेवरील शून्य पुलाचे काम पूर्ण

मुंबई : मेट्रो लाईन २बी वरील शून्य ब्रिजचा अंतिम पायलन घटक यशस्वीपणे उभारण्यात आला असून, हा ब्रिज आता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ‘झिरो’ आकारात अभिमानाने उभा आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वाकोला नाल्यावर हा पूल उभारण्यात आला आहे. हा आकार जगाला शून्य ही संकल्पना देणाऱ्या महान गणितज्ञ आर्यभट्ट यांना समर्पित आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली. १३० मीटर लांबीचा हा केबल-स्टेड ब्रिज, वाकोला नाल्यावर ८० मीटरचा मुख्य स्पॅन आणि ४० मीटर उंच स्टील पायलन असलेला, अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. ७५० मेट्रिक टन वजनाचा हा पायलन, १० प्री-फॅब्रिकेटेड घटकांतून उभारण्यात आला असून, जवळपास ५.९ किमी इतक्या जटिल वेल्डिंगचे काम प्रत्यक्ष साईटवर पूर्ण करण्यात आले.


७५० एमटी आणि ३५० एमटी क्षमतेच्या सुपर-लिफ्ट क्रेन्सच्या सहाय्याने अंतिम क्राऊन घटक बसवून ‘शून्य’चा हा आयकॉनिक आकार पूर्णत्वास नेण्यात आला. भारताच्या बौद्धिक वारशाला अभिवादन करत आधुनिक शहराच्या भविष्यास आकार देणारा हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. हा संपूर्ण पूल ज्या कमानीच्या आधाराने उभा आहे त्याचा आकार शून्यासारखा आहे.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना