२ ब मार्गिकेवरील शून्य पुलाचे काम पूर्ण

मुंबई : मेट्रो लाईन २बी वरील शून्य ब्रिजचा अंतिम पायलन घटक यशस्वीपणे उभारण्यात आला असून, हा ब्रिज आता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ‘झिरो’ आकारात अभिमानाने उभा आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वाकोला नाल्यावर हा पूल उभारण्यात आला आहे. हा आकार जगाला शून्य ही संकल्पना देणाऱ्या महान गणितज्ञ आर्यभट्ट यांना समर्पित आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली. १३० मीटर लांबीचा हा केबल-स्टेड ब्रिज, वाकोला नाल्यावर ८० मीटरचा मुख्य स्पॅन आणि ४० मीटर उंच स्टील पायलन असलेला, अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. ७५० मेट्रिक टन वजनाचा हा पायलन, १० प्री-फॅब्रिकेटेड घटकांतून उभारण्यात आला असून, जवळपास ५.९ किमी इतक्या जटिल वेल्डिंगचे काम प्रत्यक्ष साईटवर पूर्ण करण्यात आले.


७५० एमटी आणि ३५० एमटी क्षमतेच्या सुपर-लिफ्ट क्रेन्सच्या सहाय्याने अंतिम क्राऊन घटक बसवून ‘शून्य’चा हा आयकॉनिक आकार पूर्णत्वास नेण्यात आला. भारताच्या बौद्धिक वारशाला अभिवादन करत आधुनिक शहराच्या भविष्यास आकार देणारा हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. हा संपूर्ण पूल ज्या कमानीच्या आधाराने उभा आहे त्याचा आकार शून्यासारखा आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा