आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आज आणि उद्या वाहतूक निर्बंध

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरात विशेष वाहतूक नियंत्रण आदेश जारी केला आहे. हा आदेश दि. १९ व २० जानेवारी या कालावधीत लागू राहणार आहे.


आंदोलनामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत पालघरमध्ये सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.


बोईसर व मनोरकडून पालघरमध्ये येणारी तसेच पालघरहून बोईसर-मनोरकडे जाणारी जड वाहने शहरात प्रवेश करू शकणार नाहीत. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, वाहनचालकांनी ते मार्ग वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस विभाग, वाहतूक शाखा व संबंधित प्रशासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. आंदोलन व यात्रेदरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व वाहनचालक व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Comments
Add Comment

MUMBAI WEATHER : मुंबई हवामान अपडेट: मान्सूनची चाहूल, शहरात पावसाची शक्यता

MUMBAI : मान्सूनच्या आगमनासोबतच मुंबई आणि परिसरात हवामानात बदल जाणवू लागला आहे. आज, ७ जून रोजी शहरात आकाश अंशतः ढगाळ

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष