आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आज आणि उद्या वाहतूक निर्बंध

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरात विशेष वाहतूक नियंत्रण आदेश जारी केला आहे. हा आदेश दि. १९ व २० जानेवारी या कालावधीत लागू राहणार आहे.


आंदोलनामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत पालघरमध्ये सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.


बोईसर व मनोरकडून पालघरमध्ये येणारी तसेच पालघरहून बोईसर-मनोरकडे जाणारी जड वाहने शहरात प्रवेश करू शकणार नाहीत. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, वाहनचालकांनी ते मार्ग वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस विभाग, वाहतूक शाखा व संबंधित प्रशासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. आंदोलन व यात्रेदरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व वाहनचालक व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Comments
Add Comment

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.