पोळी-भात सोडता आता वजन करता येणार कमी! जाणून घ्या...

मुंबई : वजन कमी करायचं म्हटलं की सर्वात आधी भात, पोळी आणि बटाट्यांना रामराम ठोकावा लागतो, असा समज आजही अनेकांच्या मनात आहे. मात्र आहारतज्ज्ञांनी हा गैरसमज दूर करत वजन घटवण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे. खाणं बंद न करता, फक्त खाण्याची वेळ आणि क्रम बदलला तर वजन कमी होऊ शकतं, असं ते सांगतात.


तज्ज्ञांच्या मते, शरीरात चरबी साठण्यामागे ‘इन्सुलिन’ हा हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतो. आपण जेव्हा कर्बोदकं खातो, तेव्हा रक्तातील साखर वाढते आणि ती पेशींमध्ये ढकलण्यासाठी इन्सुलिन सक्रिय होतं. इन्सुलिनची पातळी सातत्याने जास्त राहिली तर चरबी साठण्याची प्रक्रिया वेग घेते. त्यामुळे साखरेत अचानक चढउतार होऊ न देणं, हाच वजन नियंत्रणाचा महत्वाचा मुद्दा आहे.


यासाठी अन्नपदार्थ पूर्णपणे टाळण्याऐवजी ते कसे खाल्ले जातात, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, भात किंवा बटाटे शिजवल्यानंतर थंड करून पुन्हा गरम केल्यास त्यातील स्टार्चची रचना बदलते. यामुळे साखर हळूहळू वाढते आणि शरीरावर ताण पडत नाही. त्याचबरोबर जेवताना आधी फायबरयुक्त पदार्थ, नंतर प्रथिनं आणि शेवटी भात-पोळी खाल्ल्यास वजन वाढीचा धोका कमी होतो.


दैनंदिन जीवनात हे पाच बदल केल्यास फरक दिसू शकतो. भात आधी शिजवून ठेवून नंतर गरम करून खाणे, रात्रीच्या जेवणात हलके व प्रथिनयुक्त पदार्थ निवडणे, जेवणानंतर थोडं चालणं, नुसती पोळी किंवा ब्रेड न खाता त्यासोबत तूप-दही-भाजी घेणे आणि जेवणाचा योग्य क्रम पाळणे या सवयी वजन कमी करण्यात मदत करतात.


थोडक्यात, उपाशी राहण्याऐवजी योग्य वेळेत खाल्लं, तर शरीर स्वतःच फॅट बर्निंग मोडमध्ये जातं. पोळी-भात खातानाही वजन आटोक्यात ठेवता येऊ शकत.

Comments
Add Comment

Independence Day Special : OTT वर पाहा 'हे' 6 देशभक्तीपर सिनेमे; अंगावर येईल काटा!

1. भारत भाग्य विधाता – ZEE5 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट कामा हॉस्पिटलमधील

Healthy Sweet Dish : सणासुदीला गोड खा, पण वजन वाढण्याची चिंता नको! ‘हे’ हेल्दी स्वीट्स नक्की ट्राय करा

मुंबई : सणासुदीचे दिवस म्हटले की घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू होते. लाडू, बर्फी, श्रीखंड, मोदक अशा पदार्थांवर

Gatari Special Food : गटारीच्या मेजवानीत नेहमीचं चिकन-मटण नको! ट्राय करा हे हटके नॉनव्हेज पदार्थ

चिकन-मटणाच्या नेहमीच्या पदार्थांऐवजी या हटके रेसिपीजमधून तुमच्या मेजवानीला द्या खास कोकणी-मराठमोळा ट्विस्ट

Gatari Amavasya : गटारीच्या दिवशीच सूर्यग्रहण? नॉन वेज खाण्यापूर्वी 'हे' नक्कीच जाणून घ्या...

मुंबई :  महाराष्ट्रात गटारी अमावस्या म्हणून ओळखली जाणारी आषाढ दीप अमावस्या यंदा 12 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे. श्रावण

Monsoon Health Tips : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? ‘हे’ सोपे उपाय करा; आरोग्य राहील एकदम फिट!

मुंबई : पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, त्वचेचे संसर्ग

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा