पोळी-भात सोडता आता वजन करता येणार कमी! जाणून घ्या...

मुंबई : वजन कमी करायचं म्हटलं की सर्वात आधी भात, पोळी आणि बटाट्यांना रामराम ठोकावा लागतो, असा समज आजही अनेकांच्या मनात आहे. मात्र आहारतज्ज्ञांनी हा गैरसमज दूर करत वजन घटवण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे. खाणं बंद न करता, फक्त खाण्याची वेळ आणि क्रम बदलला तर वजन कमी होऊ शकतं, असं ते सांगतात.


तज्ज्ञांच्या मते, शरीरात चरबी साठण्यामागे ‘इन्सुलिन’ हा हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतो. आपण जेव्हा कर्बोदकं खातो, तेव्हा रक्तातील साखर वाढते आणि ती पेशींमध्ये ढकलण्यासाठी इन्सुलिन सक्रिय होतं. इन्सुलिनची पातळी सातत्याने जास्त राहिली तर चरबी साठण्याची प्रक्रिया वेग घेते. त्यामुळे साखरेत अचानक चढउतार होऊ न देणं, हाच वजन नियंत्रणाचा महत्वाचा मुद्दा आहे.


यासाठी अन्नपदार्थ पूर्णपणे टाळण्याऐवजी ते कसे खाल्ले जातात, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, भात किंवा बटाटे शिजवल्यानंतर थंड करून पुन्हा गरम केल्यास त्यातील स्टार्चची रचना बदलते. यामुळे साखर हळूहळू वाढते आणि शरीरावर ताण पडत नाही. त्याचबरोबर जेवताना आधी फायबरयुक्त पदार्थ, नंतर प्रथिनं आणि शेवटी भात-पोळी खाल्ल्यास वजन वाढीचा धोका कमी होतो.


दैनंदिन जीवनात हे पाच बदल केल्यास फरक दिसू शकतो. भात आधी शिजवून ठेवून नंतर गरम करून खाणे, रात्रीच्या जेवणात हलके व प्रथिनयुक्त पदार्थ निवडणे, जेवणानंतर थोडं चालणं, नुसती पोळी किंवा ब्रेड न खाता त्यासोबत तूप-दही-भाजी घेणे आणि जेवणाचा योग्य क्रम पाळणे या सवयी वजन कमी करण्यात मदत करतात.


थोडक्यात, उपाशी राहण्याऐवजी योग्य वेळेत खाल्लं, तर शरीर स्वतःच फॅट बर्निंग मोडमध्ये जातं. पोळी-भात खातानाही वजन आटोक्यात ठेवता येऊ शकत.

Comments
Add Comment

Dengue Vaccine : भारतात डेंग्यूविरोधातील पहिल्या लसीला मंजुरी; 'क्युडेन्गा' लशीबाबत जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

डेंग्यूच्या (Dengue) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय औषध

Mosquito Control Tips : पावसाळ्यात घराला डासांपासून कसं वाचवाल? आजारांचा धोका टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

पावसाळ्यात डासांचा त्रास वाढतो. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी

Good Hair : केस गळतायत? मग आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ८ पदार्थ; केस होतील मजबूत आणि दाट

मुंबई : बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे या

Meghalaya tourism : स्वर्गाहून सुंदर देखावा! पावसाळ्यात 'या' धबधब्याचे रौद्र रूप पाहून व्हाल थक्क

१. मेघालयाचे पावसाळी सौंदर्य आणि मुख्य आकर्षण पावसाळ्याची चाहूल लागताच मेघालयातील निसर्ग आपले खरे वैभव दाखवतो.

Smart Fashion Hacks : महागडे कपडे न घेता स्टायलिश दिसायचंय? फॉलो करा 'या' स्मार्ट फॅशन हॅक्स

तुम्ही देखील स्टायलिश दिसण्यासाठी नेहमी महागडे कपडे खरेदी करता का? खरंतर नेहमीच महागडे खरेदी करण्याची गरज नसते.

Starter Marriage Trend : 'जमलं तर ठीक, नाहीतर घटस्फोट'... काय आहे 'स्टार्टर मॅरेज'ची नवी संकल्पना?

Starter Marriage Trend : भारतात लग्न हे एक पवित्र बंधन मानले जाते. सात जन्मांची साथ, कुटुंबांची जुळवाजुळव आणि आयुष्यभराची साथ