जाणून घ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर, शिवाय तिकीट रद्द केल्यास मिळेल इतका रिफंड.. जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई: रात्रीच्या प्रवासासाठी खास तयार करण्यात आलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन आता सेवेत दाखल झाली असून प्रवाशांमध्ये या गाडीबाबत उत्सुकता वाढली आहे. आधुनिक सुविधा, वेगवान प्रवास आणि आरामदायी डबे ही या ट्रेनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मात्र प्रवासाचे नियोजन करताना तिकीट रद्द करायचे झाल्यास नेमका किती आर्थिक फटका बसणार, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने तिकीट रद्दीकरण आणि परताव्याचे नियम स्पष्ट केले आहेत.


रेल्वेच्या नियमांनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनचे कन्फर्म तिकीट रद्द केल्यास परतावा प्रवासाच्या वेळेवर अवलंबून असणार आहे. जर प्रवाशाने ट्रेन सुटण्याच्या किमान ७२ तास आधी तिकीट रद्द केले, तर तिकीट रकमेपैकी २५ टक्के शुल्क वजा करून उर्वरित रक्कम परत दिली जाईल.


प्रवासाच्या वेळेच्या अधिक जवळ तिकीट रद्द केल्यास कपात वाढते. ट्रेन सुटण्याच्या ८ तास ते ७२ तासांच्या कालावधीत तिकीट रद्द केल्यास तिकीट रकमेपैकी ५० टक्के रक्कम कापली जाईल आणि उरलेली रक्कम प्रवाशाला परत मिळेल.


मात्र ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपूर्वी तिकीट रद्द न केल्यास किंवा त्यानंतर रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवास रद्द करण्याचा निर्णय वेळेत घेणे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हावडा–कामाख्या मार्गावर देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा कंदील दाखवला असून ही सेवा प्रिमियम रात्रीच्या प्रवासासाठी महत्त्वाची मानली जात आहे. आधुनिक रेल्वेचा अनुभव घ्यायचा असल्यास तिकीट बुकिंगसोबतच रद्दीकरणाचे नियम लक्षात ठेवणे प्रवाशांच्या फायद्याचे ठरेल.

Comments
Add Comment

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी