ठाण्यात भाजपच्या प्रतिभा मढवी २८ नगरसेवकांमधून अव्वल

७१.५६ टक्के विक्रमी मतदानासह विजयी


ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ३९ पैकी २८ जागा जिंकत सुमारे ७५ टक्के स्ट्राईक रेट राखला आहे. या २८ विजयी नगरसेवकांमध्ये नौपाडा प्रभागातील प्रतिभा राजेश मढवी या उमेदवार ७१.५६ टक्के मतांसह भाजपमधील सर्वाधिक मताधिक्याने विजयी ठरल्या आहेत.


नौपाडा प्रभाग क्रमांक २१ ब मध्ये एकूण २५ हजार ७७ मतांपैकी प्रतिभा मढवी यांना तब्बल १७ हजार ९४५ मते मिळाली. डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या सामाजिक कार्याची ही मतदारांकडून मिळालेली पोहोचपावती असल्याचे मानले जात आहे.


ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत महायुतीत असलेल्या भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. २०१७ मध्ये भाजपच्या २३ जागा होत्या; यंदा त्यात ५ जागांची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय केळकर, निवडणूक प्रभारी आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने ओवळा ते शिळपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघांत मजबूत कामगिरी केली. दरम्यान, भाजप–शिवसेना महायुतीतून ठाण्यात लढलेल्या एकूण १३१ जागांपैकी सात उमेदवारांना ७० टक्क्यांहून अधिक मतदान मिळाले आहे. यामध्ये शिवसेनेचे योगेश जानकर (७६.४६ टक्के) अव्वल ठरले असून, त्यापाठोपाठ डॉ. दर्शना जानकर (७२.३३ टक्के) आणि भाजपच्या प्रतिभा मढवी (७१.५६ टक्के) यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.

Comments
Add Comment

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे

Mira Road Forced Conversion : लग्नाचे आमिष, धर्मांतराची सक्ती अन् अमानुष मारहाण! मिरा रोडमध्ये हिंदू तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार

मुंबई (Mira Road Forced Conversion Case) : मुंबईलगतच्या मिरा रोड (Mira Road) परिसरातील काशीमीरा येथे एका हिंदू तरुणीची मुस्लिम युवकाकडून

Kalyan Crime : प्रेमविवाहाचा राग मनातच ठेवला; साखरपुडा मोडून लग्न केलेल्या मुलीची वडिलांनी केली हत्या

Crime News : कल्याण शहरात नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका