मुंबईत उभे राहणार ३० मजली बिहार भवन, नितीश सरकारकडून ३१४ कोटींचा निधी मंजूर

मुंबई : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी तब्बल ३१४.२० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन एस्टेट येथे उभारला जाईल. त्यासाठी सुमारे ०.६८ एकर (२७५२.७७ चौरस मीटर) क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे.


प्रस्तावित बिहार भवन ३० मजली असेल. बेसमेंटसह या इमारतीची एकूण उंची सुमारे ६९ मीटर इतकी असेल. ही इमारत पूर्णपणे आधुनिक वास्तूशैलीत उभारली जाईल आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. यात सौर पॅनेल, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प, तसेच हिरवळीचे क्षेत्र यासारख्या सुविधांचा समावेश असेल. दिल्लीतील बिहार भवनाप्रमाणेच येथे शासकीय कामकाजासाठी कार्यालये, ७२ आसनांची सभागृहे, प्रशासकीय विभाग आणि अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध असतील.


मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने, रोजगार, व्यवसाय, उपचार आणि इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात बिहारमधील नागरिक येथे येतात. अशा वेळी हे बिहार भवन प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी निवास, मार्गदर्शन आणि शासकीय सहकार्य मिळवण्यात मोठी मदत करेल. दरम्यान, बिहार भवन निर्माण विभागाने या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, सध्या परिसराची सीमा भिंत पूर्ण झाली आहे. प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती झाली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल.

Comments
Add Comment

समुद्रात मासे कमी आणि कचराच जास्त; महापालिका सभागृहात कोळी समाजाच्या नगरसेवकांना मांडावी लागली व्यथा

मुंबई: मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात समुद्रातील कचरा आणि मलमिश्रित पाणी जात असल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र चिंता

Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक मंगळवारी रात्री

मुंबईतील बांधकामे सिल करा, विकासकांना टाका काळ्या यादीत; मुंबई महापालिकेची भूमिका

मुंबई: मार्च महिना संपत असल्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने मालमत्ता कराची वसूली जोरात सुरु असून ज्या

मिरा-भाईंदरमध्ये अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईजवळील मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ ते ५

'मत्स्य उत्पादन आणि जलवाहतुकीत महाराष्ट्र वर्षभरात पहिल्या तीन राज्यांत असेल'

मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत ग्वाही; मुंबई महानगरात लवकरच ६ जलमार्ग सुरू करणार किनारपट्टीची सुरक्षा आणि

आरोग्य समिती अध्यक्षांचा पहिला वहिला अनोखा प्रयोग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या