मुंबईत उभे राहणार ३० मजली बिहार भवन, नितीश सरकारकडून ३१४ कोटींचा निधी मंजूर

मुंबई : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी तब्बल ३१४.२० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन एस्टेट येथे उभारला जाईल. त्यासाठी सुमारे ०.६८ एकर (२७५२.७७ चौरस मीटर) क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे.


प्रस्तावित बिहार भवन ३० मजली असेल. बेसमेंटसह या इमारतीची एकूण उंची सुमारे ६९ मीटर इतकी असेल. ही इमारत पूर्णपणे आधुनिक वास्तूशैलीत उभारली जाईल आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. यात सौर पॅनेल, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प, तसेच हिरवळीचे क्षेत्र यासारख्या सुविधांचा समावेश असेल. दिल्लीतील बिहार भवनाप्रमाणेच येथे शासकीय कामकाजासाठी कार्यालये, ७२ आसनांची सभागृहे, प्रशासकीय विभाग आणि अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध असतील.


मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने, रोजगार, व्यवसाय, उपचार आणि इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात बिहारमधील नागरिक येथे येतात. अशा वेळी हे बिहार भवन प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी निवास, मार्गदर्शन आणि शासकीय सहकार्य मिळवण्यात मोठी मदत करेल. दरम्यान, बिहार भवन निर्माण विभागाने या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, सध्या परिसराची सीमा भिंत पूर्ण झाली आहे. प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती झाली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल.

Comments
Add Comment

आताची सर्वात मोठी बातमी-भारतीय अर्थव्यवस्था सुसाटच! आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या अहवालात देशाचा जीडीपी ७.३% वेगाने वाढण्याचा उल्लेख

प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था (International Monetary Fund IMF) संस्थेने आपल्या जागतिक आर्थिक आऊटलूक अहवालात भारताबाबत

अस्थिरतेत जागतिक इतिहासात चांदी प्रथमच '३०५०००' पार, सोन्यातही वाढ कायम! गुंतवणूकदारांनी आता काय करावे? वाचा सखोल विश्लेषण

मोहित सोमण: आज जागतिक भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचांदीत तुफान वाढ झाली आहे. सोने ३% व चांदी ५%

मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होणार.. जिथे युतीमध्ये लढलो तिथे महायुतीचा महापौर होणार -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट

मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल

मोदींना भेटण्यासाठी UAE चे राजे ४.२० वाजता दिल्लीत येणार आणि ०६.०५ वाजता मायदेशी रवाना होणार

नवी दिल्ली : संयुक्त अरब आमिराती अर्थात UAE चे राजे आणि अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान सोमवारी भारतात

भाजपचे आमदार संदीप जोशी यांचा निवृत्तीचा निर्णय

मुंबई : नागपूरचे माजी महापौर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार संदीप जोशी यांनी निवृत्तीचा

कांदिवली–बोरिवली सहावा ट्रॅक सुरू; महिन्याभराच्या ब्लॉकनंतर पश्चिम रेल्वेने घेतला मोकळा श्वास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सततच्या ब्लॉकमुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे.