मुंबईत उभे राहणार ३० मजली बिहार भवन, नितीश सरकारकडून ३१४ कोटींचा निधी मंजूर

मुंबई : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी तब्बल ३१४.२० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन एस्टेट येथे उभारला जाईल. त्यासाठी सुमारे ०.६८ एकर (२७५२.७७ चौरस मीटर) क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे.


प्रस्तावित बिहार भवन ३० मजली असेल. बेसमेंटसह या इमारतीची एकूण उंची सुमारे ६९ मीटर इतकी असेल. ही इमारत पूर्णपणे आधुनिक वास्तूशैलीत उभारली जाईल आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. यात सौर पॅनेल, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प, तसेच हिरवळीचे क्षेत्र यासारख्या सुविधांचा समावेश असेल. दिल्लीतील बिहार भवनाप्रमाणेच येथे शासकीय कामकाजासाठी कार्यालये, ७२ आसनांची सभागृहे, प्रशासकीय विभाग आणि अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध असतील.


मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने, रोजगार, व्यवसाय, उपचार आणि इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात बिहारमधील नागरिक येथे येतात. अशा वेळी हे बिहार भवन प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी निवास, मार्गदर्शन आणि शासकीय सहकार्य मिळवण्यात मोठी मदत करेल. दरम्यान, बिहार भवन निर्माण विभागाने या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, सध्या परिसराची सीमा भिंत पूर्ण झाली आहे. प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती झाली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल.

Comments
Add Comment

राणेंचा बालेकिल्ला अभेद्य! सिंधुदुर्गच्या जनतेने मशाल विझवली

सुहास शेलार कोकणच्या लाल मातीतील राजकारणाचे संदर्भ जरी बदलत असले, तरी येथील रांगडा स्वभाव आणि नेतृत्वावरील

पंजाबमध्ये लॉ कॉलेजच्या वर्गात हत्या, विद्यार्थ्याने झाडल्या गोळ्या

पंजाब : लॉ कॉलेज मधील एका हत्याकांडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भर वर्गात गोळीबार झाल्यामुळे

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली

 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची प्रतिक्रिया मुंबई :

Dada Bhuse : 'परीक्षा ही सुंदर प्रवासाची सुरुवात; आत्मविश्वासाने सामोरे जा', मा.शिक्षण मंत्री श्री .दादाजी भुसे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि

LIVE : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी सुरू, बघा कोण आघाडीवर ?

मुंबई : महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी