किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील निर्णायक तिसरा सामना खेळवला जात होता. या सामन्यात न्यूझीलंडने ३३७ धावांचा टप्पा पार करत भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी शतके केली.


या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. पण न्यूझीलंडने सलामीवीरांच्या विकेट्स झटपट गमावल्या. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने हेन्री निकोल्सला शून्यावर बाद केले. तसेच दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेवॉन कॉनवेला हर्षित राणाने ५ धावांवर माघारी धाडले. पण नंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांनी डाव सावरताना ५३ धावांची भागीदारी केली. पण खेळपट्टीवर स्थिरावलेल्या विल यंगला ४१ चेंडूत ३० धावांवर असताना १३ व्या षटकात हर्षित राणाने बाद केले. त्याचा अफलातून झेल रवींद्र जडेजाने घेतला.


मात्र यानंतर मिशेलने ग्लेन फिलिप्सला साथीला घेतले. या दोघांनी खराब चेंडूंचा समाचार घेत पाहाता पाहाता द्वीशतकी भागीदारी केली. या दोघांनीही शतके साजरी केली. मिशेलन ३६ व्या षटकात १०६ चेंडूत त्याचे शतक झळकावले. हे त्याचे नववे वनडे शतक आहे, तर भारताविरूद्धचे चौथे शतक आहे. याशिवाय चालू मालिकेतील सलग दुसरे शतक आहे. त्याच्यापाठोपाठ ४२ व्या षटकात फिलिप्सनेही ८३ चेंडूत शतक केले. पण शतकानंतर अखेर फिलिप्सला ४४ व्या षटकात अर्शदीप सिंगने बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक के.एल राहुलने घेतला. त्याने ८८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १०६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्याने त्याची मिशेल सोबतची २१९ धावांची भागीदारी तोडली. तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. ४५ व्या षटकात मिशेलला मोहम्मद सिराजने बाद केल. मिशेलने १३१ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १३७ धावा केल्या. त्यानंतर मिचेल हे यालाही कुलदीप यादवने २ धावांवर पायचीत केले. तर झाकरी फोक्सने ८ चेंडूत १० धावा केल्या.


४९ व्या षटकात ख्रिनस्टन क्लार्कही ११ धावांवर हर्षित राण्याच्या गोलंदाजीवर त्रिफळाची झाला. पण मायकल ब्रेसवेलने शेवटच्या दोन षटकात आक्रमक खेळताना १८ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद ३३७ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा करत भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य पार करावे लागणार होते.

Comments
Add Comment

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)

IND vs ENG : कार्डिफमध्ये इंग्लंडची बाजी; भारताला पराभूत करत मालिकेत साधली बरोबरी

कार्डिफ : जो रूट (Joe Root) याच्या नाबाद ९९ धावांच्या (Runs) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा दुसऱ्या एकदिवसीय (ODI)