कर्जत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी संतोष पाटील यांची निवड

कर्जत : कर्जत नगर परिषदेच्या राजकारणात उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उबाठा गटाचे संतोष सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगराध्यक्षा पुष्पा दगडे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीची विशेष सभा पार पडली. या पदासाठी परिवर्तन विकास आघाडीकडून संतोष पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.


निर्धारित वेळेत दुसरा कोणताही अर्ज न आल्याने, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटील यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.


निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांना सन्मानाने त्यांच्या दालनात नेऊन बसवण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पुष्पा दगडे, माजी सभापती पुंडलिक पाटील, उबाठा गट, उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत, माजी सभापती प्रदीप ठाकरे, जिल्हा परिषद माजी सदस्य राजेश जाधव यांच्यासह किशोर कदम, अरुणा वायकर, संकेत भासे व अन्य सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करू," असा विश्वास नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांनी निवडीनंतर व्यक्त केला.

Comments
Add Comment

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.