मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील चार नगरसेवकांचा समावेश आहे. मुस्लीम नगरसेवकांची ही वाढती संख्या त्यातही मुस्लीम महिलांची जास्त संख्या लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील मुस्लिमबहुल पट्ट्यांमध्येही एआयएमआयएमकडे वळलेली मते आता निर्णायक ठरत आहेत.


मागील कार्यकाळात २७ नगरसेवकांची संख्या आता थेट ३१ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता मुस्लिम मतदारांना कोणी यापुढे गृहीत धरू नये असा इशाराच यातून मिळत आहे. मुंबई शहरातील मुस्लिम बहुल विभागात जी मते पूर्वी काँग्रेस व नंतर समाजवादी पार्टीला पडत होती. आता तीच मते हैदराबाद पुरती मर्यादित असलेल्या एआयएमआयएमला पडताना दिसत आहे तर मुंबईतील बहुतांश भागात मुस्लिम मते ही भाजपला विरोध म्हणून मुस्लिम मतदारास मिळतात. हे लक्षात घेता यंदा सर्वच पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना तिकीट मोठ्या प्रमाणात दिले होते त्यात शिवसेना उबाठाचे नऊ उमेदवारांपैकी तीन निवडून आले तर समाजवादी पार्टी व काँग्रेसनेही मुस्लिम मतदार उभे करून नगरसेवक निवडून आणले. मागील कार्यकाळात २७ नगरसेवक होते ती संख्या आता ३१ झाली आहे. विशेष म्हणजे भाजपने एकही मुस्लिम उमेदवार यावेळेस दिला नव्हता.

Comments
Add Comment

समुद्रात मासे कमी आणि कचराच जास्त; महापालिका सभागृहात कोळी समाजाच्या नगरसेवकांना मांडावी लागली व्यथा

मुंबई: मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात समुद्रातील कचरा आणि मलमिश्रित पाणी जात असल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र चिंता

मुंबईतील बांधकामे सिल करा, विकासकांना टाका काळ्या यादीत; मुंबई महापालिकेची भूमिका

मुंबई: मार्च महिना संपत असल्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने मालमत्ता कराची वसूली जोरात सुरु असून ज्या

मिरा-भाईंदरमध्ये अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईजवळील मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ ते ५

आरोग्य समिती अध्यक्षांचा पहिला वहिला अनोखा प्रयोग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या

मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना

मुंबई: अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नियोजित बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक परिषदेत मंजूर

मुंबई : राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खाजगी कौशल्य