मिरा-भाईंदरमध्ये अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईजवळील मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात सापडल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केलं. परिसरातील चार ते पाच इमारती या आगीच्या विळख्यात सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग इतक्या वेगाने पसरली की, काही घरांनाही तिचा फटका बसला. घटनेनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून वातावरण अत्यंत धोकादायक बनले आहे.


आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक तास प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने परिसर सुरक्षित करण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, काही प्राथमिक माहितीनुसार गॅस सिलेंडर स्फोटाची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Dadar Savarkar Mandai : दादर पश्चिम येथील सावरकर मंडईच्या दुरुस्तीचा अखेर मुहूर्त सापडला

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) दादर पश्चिम येथील मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या

BMC : मुंबईत बेकायदेशीरपणे डेब्रिज टाकणाऱ्यांना बसणार चाप

- सचिन धानजी महापालिका विकसित करणार 'एकात्मिक बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल' दिल्लीत यशस्वी प्रयोग

Vinayak Raut : विनायक राऊत प्रकरणाला नवे वळण! अटकपूर्व जामिनासाठी धाव, भोंदूबाबा अटकेत; सूनेच्या आरोपांनी खळबळ

मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील कौटुंबिक छळ व जादूटोणाविरोधी

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Local Train News : केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे; मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की त्यांनी केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे आणि

Pratap Sarnaik : आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..

ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार. पंढरपूर :- आषाढी यात्रेच्या