मुंबई–नवी मुंबई प्रवास होणार अधिक स्वस्त; टोलमध्ये ५० टक्के सूट, ई-वाहनांसाठी टोल माफ

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूवरील टोलमध्ये देण्यात आलेली ५० टक्के सवलत पुढील एक वर्ष कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला अधिकृत मान्यता देण्यात आली.


या निर्णयानुसार १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत अटल सेतूवर टोलमध्ये अर्धी सवलत लागू राहणार आहे. यासोबतच इलेक्ट्रिक मोटार कार आणि इलेक्ट्रिक बस यांना अटल सेतूवर पूर्णपणे टोलमुक्त प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णयही अधिसूचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ई-वाहनधारकांसह नियमित प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.


राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी ४ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूवरील टोलमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. आता हा निर्णय पुढे सुरू ठेवत प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचे सुधारित टोल दरही निश्चित करण्यात आले आहेत.



नवीन टोल दरानुसार,


मोटार कार, जीप, व्हॅन आणि हलक्या मोटार वाहनांसाठी २५० २५०, २०० आणि ५० रुपये असा टोल आकारला जाईल.


हलके व्यावसायिक वाहन, हलके मालवाहू वाहन आणि मिनीबससाठी ४०० , ३२० आणि ८० रुपये टोल


ट्रक व बससाठी ८३० , ६५५ आणि १७० रुपये, तर तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ९०५ , ७१५ आणि १८५ रुपये टोल आकारला जाणार आहे.


अवजड बांधकाम यंत्रसामग्री आणि जमीन खोदाई यंत्रसामग्री वाहनांसाठी १३०० , १०३० आणि २७० रुपये,


अति अवजड वाहनांसाठी १५०० , १२५५ आणि ३२५ रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे.


या निर्णयामुळे मुंबई–नवी मुंबई प्रवास अधिक किफायतशीर होणार असून अटल सेतूवरील वाहतूक वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रोज प्रवास करणारे कर्मचारी, व्यापारी आणि ई-वाहनधारकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)