मुंबई–नवी मुंबई प्रवास होणार अधिक स्वस्त; टोलमध्ये ५० टक्के सूट, ई-वाहनांसाठी टोल माफ

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूवरील टोलमध्ये देण्यात आलेली ५० टक्के सवलत पुढील एक वर्ष कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला अधिकृत मान्यता देण्यात आली.


या निर्णयानुसार १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत अटल सेतूवर टोलमध्ये अर्धी सवलत लागू राहणार आहे. यासोबतच इलेक्ट्रिक मोटार कार आणि इलेक्ट्रिक बस यांना अटल सेतूवर पूर्णपणे टोलमुक्त प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णयही अधिसूचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ई-वाहनधारकांसह नियमित प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.


राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी ४ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूवरील टोलमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. आता हा निर्णय पुढे सुरू ठेवत प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचे सुधारित टोल दरही निश्चित करण्यात आले आहेत.



नवीन टोल दरानुसार,


मोटार कार, जीप, व्हॅन आणि हलक्या मोटार वाहनांसाठी २५० २५०, २०० आणि ५० रुपये असा टोल आकारला जाईल.


हलके व्यावसायिक वाहन, हलके मालवाहू वाहन आणि मिनीबससाठी ४०० , ३२० आणि ८० रुपये टोल


ट्रक व बससाठी ८३० , ६५५ आणि १७० रुपये, तर तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ९०५ , ७१५ आणि १८५ रुपये टोल आकारला जाणार आहे.


अवजड बांधकाम यंत्रसामग्री आणि जमीन खोदाई यंत्रसामग्री वाहनांसाठी १३०० , १०३० आणि २७० रुपये,


अति अवजड वाहनांसाठी १५०० , १२५५ आणि ३२५ रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे.


या निर्णयामुळे मुंबई–नवी मुंबई प्रवास अधिक किफायतशीर होणार असून अटल सेतूवरील वाहतूक वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रोज प्रवास करणारे कर्मचारी, व्यापारी आणि ई-वाहनधारकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची