उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या उबाठाला आजवर सर्वांधिक कमी जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत उबाठाचे सुमारे ५७ नगरसेवक न निवडून आले असून ही संख्या आजवरची सर्वांत कमी आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत उबाठा शिवसेना प्रथमच विरोधी पक्षात बसलेला पहायला मिळणार आहे.


मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या निवडणुकीत उबाठा पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत उबाठा पक्षाने १३७ जागी आपले उमेदवार दिले होते. या निवडणुकीत उबाठाचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. यापूर्वी झालेल्या सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपासोबत युती तोडून प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ८२ नगरसेवक निवडून आले होते. परंतु यावेळी शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर मूळ शिवसेना ठाकरेंचीच म्हणणाऱ्या उबाठाला मुंबईत पुन्हा आपले यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे प्रथमच त्यांचा आकडा कमीवर आला आहे.


यापूर्वी २०१२मध्ये शिवसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले होते. तर त्यापूर्वी २००७मध्ये ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे मागील निवडणुकीतील उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या पाहता प्रथमच त्यांचे प्रथमच नगरसेवक कमी आले आहे. त्यामुळे मागील १९९७ पासून सलग सत्तेवर असणाऱ्या उबाठाला आता प्रथमच विरोधी पक्षात बसवण्याची वेळ आली आहे.



उबाठाची मागील चार निवडणुकीतील आकडेवारी


सन २०२६ : सुमारे ६५ नगरसेवक


सन २०१७ : ८२ नगरसेवक


सन २०१२ : ७५ नगरसेवक


सन २००७ : ८४ नगरसेवक


सन २००२ : ९० नगरसेवक


सन १९९७ : ९६ नगरसेवक

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र

Jagar Samatecha : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या

Nitesh Rane :चंद्रपूर जिल्ह्यात झिंगे पालन व्यवसायाला मोठी चालना देणार

मुंबई, : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे