उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या उबाठाला आजवर सर्वांधिक कमी जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत उबाठाचे सुमारे ५७ नगरसेवक न निवडून आले असून ही संख्या आजवरची सर्वांत कमी आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत उबाठा शिवसेना प्रथमच विरोधी पक्षात बसलेला पहायला मिळणार आहे.


मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या निवडणुकीत उबाठा पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत उबाठा पक्षाने १३७ जागी आपले उमेदवार दिले होते. या निवडणुकीत उबाठाचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. यापूर्वी झालेल्या सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपासोबत युती तोडून प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ८२ नगरसेवक निवडून आले होते. परंतु यावेळी शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर मूळ शिवसेना ठाकरेंचीच म्हणणाऱ्या उबाठाला मुंबईत पुन्हा आपले यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे प्रथमच त्यांचा आकडा कमीवर आला आहे.


यापूर्वी २०१२मध्ये शिवसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले होते. तर त्यापूर्वी २००७मध्ये ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे मागील निवडणुकीतील उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या पाहता प्रथमच त्यांचे प्रथमच नगरसेवक कमी आले आहे. त्यामुळे मागील १९९७ पासून सलग सत्तेवर असणाऱ्या उबाठाला आता प्रथमच विरोधी पक्षात बसवण्याची वेळ आली आहे.



उबाठाची मागील चार निवडणुकीतील आकडेवारी


सन २०२६ : सुमारे ६५ नगरसेवक


सन २०१७ : ८२ नगरसेवक


सन २०१२ : ७५ नगरसेवक


सन २००७ : ८४ नगरसेवक


सन २००२ : ९० नगरसेवक


सन १९९७ : ९६ नगरसेवक

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर