केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी वळण लागले आहे. तवांग परिसरात घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एका मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण पर्यटन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


केरळमधून सात तरुणांचा एक गट अरुणाचल प्रदेशातील तवांग शहरात पर्यटनासाठी दाखल झाला होता. शुक्रवारी हे सर्वजण सुमारे १३ हजार फूट उंचीवर असलेल्या प्रसिद्ध सेल लेक परिसरात गेले. या भागात प्रचंड थंडीमुळे तलावाचे पाणी पूर्णपणे गोठले होते. बर्फावरून चालण्याचा मोह काही पर्यटकांना आवरता आला नाही.


दरम्यान, चालताना एका तरुणाचा पाय घसरला आणि तो थेट बर्फाखालील थंड पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दिनू आणि महादेव या दोघांनी कोणताही विचार न करता पाण्यात उडी घेतली. पाय घसरलेला तरुण सुदैवाने बाहेर काढण्यात यश आले, मात्र दिनू आणि महादेव हे दोघेही बर्फाळ पाण्यात अडकले. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक तास प्रयत्न करूनही रात्री उशिरापर्यंत एकाच तरुणाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्याचा शोध अद्याप सुरू आहे. अत्यंत थंड तापमान आणि बर्फामुळे शोधमोहीमेत अडथळे येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पर्यटकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. डिसेंबर महिन्यातच गोठलेल्या तलावांजवळ जाणे आणि बर्फावर चालणे धोकादायक असल्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली होती. वरून मजबूत वाटणारा बर्फाचा थर प्रत्यक्षात वजन सहन करू शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते. सूचना फलक असूनही इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.


पर्यटकांना सावध करण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी सुचना फलकही लावण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे

Comments
Add Comment

दिल्लीसह चार राज्यांत सतर्कतेचा इशारा; २६ जानेवारीआधी सुरक्षायंत्रणा अलर्ट मोडवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी