केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी वळण लागले आहे. तवांग परिसरात घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एका मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण पर्यटन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


केरळमधून सात तरुणांचा एक गट अरुणाचल प्रदेशातील तवांग शहरात पर्यटनासाठी दाखल झाला होता. शुक्रवारी हे सर्वजण सुमारे १३ हजार फूट उंचीवर असलेल्या प्रसिद्ध सेल लेक परिसरात गेले. या भागात प्रचंड थंडीमुळे तलावाचे पाणी पूर्णपणे गोठले होते. बर्फावरून चालण्याचा मोह काही पर्यटकांना आवरता आला नाही.


दरम्यान, चालताना एका तरुणाचा पाय घसरला आणि तो थेट बर्फाखालील थंड पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दिनू आणि महादेव या दोघांनी कोणताही विचार न करता पाण्यात उडी घेतली. पाय घसरलेला तरुण सुदैवाने बाहेर काढण्यात यश आले, मात्र दिनू आणि महादेव हे दोघेही बर्फाळ पाण्यात अडकले. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक तास प्रयत्न करूनही रात्री उशिरापर्यंत एकाच तरुणाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्याचा शोध अद्याप सुरू आहे. अत्यंत थंड तापमान आणि बर्फामुळे शोधमोहीमेत अडथळे येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पर्यटकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. डिसेंबर महिन्यातच गोठलेल्या तलावांजवळ जाणे आणि बर्फावर चालणे धोकादायक असल्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली होती. वरून मजबूत वाटणारा बर्फाचा थर प्रत्यक्षात वजन सहन करू शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते. सूचना फलक असूनही इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.


पर्यटकांना सावध करण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी सुचना फलकही लावण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे

Comments
Add Comment

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.

धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.

Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द

मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील

Delhi Airport : पश्चिम आशियातील तणावामुळे दिल्ली विमानतळावरील उड्डाणे विस्कळीत

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये वाढत्या संघर्षामुळे दिल्ली विमानतळावरील अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे. काही

Israel - Iran War : पंतप्रधान मोदींची इराण - इस्रायलच्या प्रमुखांशी चर्चा; सुरक्षा मंत्रिमंडळासोबत बैठक

अमेरिका - इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर,

Jammu And Kashmir News : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये पाकिस्तानी ड्रोन; भारतीय सैन्याकडून गोळीबार होताच पळाले

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमाभागात पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा वाढू लागल्या आहेत. एकीकडे