केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी वळण लागले आहे. तवांग परिसरात घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एका मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण पर्यटन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


केरळमधून सात तरुणांचा एक गट अरुणाचल प्रदेशातील तवांग शहरात पर्यटनासाठी दाखल झाला होता. शुक्रवारी हे सर्वजण सुमारे १३ हजार फूट उंचीवर असलेल्या प्रसिद्ध सेल लेक परिसरात गेले. या भागात प्रचंड थंडीमुळे तलावाचे पाणी पूर्णपणे गोठले होते. बर्फावरून चालण्याचा मोह काही पर्यटकांना आवरता आला नाही.


दरम्यान, चालताना एका तरुणाचा पाय घसरला आणि तो थेट बर्फाखालील थंड पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दिनू आणि महादेव या दोघांनी कोणताही विचार न करता पाण्यात उडी घेतली. पाय घसरलेला तरुण सुदैवाने बाहेर काढण्यात यश आले, मात्र दिनू आणि महादेव हे दोघेही बर्फाळ पाण्यात अडकले. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक तास प्रयत्न करूनही रात्री उशिरापर्यंत एकाच तरुणाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्याचा शोध अद्याप सुरू आहे. अत्यंत थंड तापमान आणि बर्फामुळे शोधमोहीमेत अडथळे येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पर्यटकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. डिसेंबर महिन्यातच गोठलेल्या तलावांजवळ जाणे आणि बर्फावर चालणे धोकादायक असल्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली होती. वरून मजबूत वाटणारा बर्फाचा थर प्रत्यक्षात वजन सहन करू शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते. सूचना फलक असूनही इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.


पर्यटकांना सावध करण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी सुचना फलकही लावण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे

Comments
Add Comment

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण