परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल पेटली आहे. काँग्रेसच्या मदतीने ‘उबाठा’ शिवसेना निर्विवाद बहुमतापर्यंत जाऊन पोहोचली असून भारतीय जनता पक्षाला केवळ बारा जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या असून जनसुराज्य पक्षाला ४, यशवंत सेना १, अपक्ष १ असे महापालिकेतील पक्षीय बलाबल आहे. तब्बल २५ जागा मिळवून उबाठा शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.


काँग्रेस पक्षासोबत उबाठाची निवडणूकपूर्व आघाडी झाल्याने आणि काँग्रेसला १२ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आघाडी मिळवली होती. यावेळी वरपूडकरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तरीही त्यांच्या या प्रवेशाचा भाजपला कोणताही फायदा झाला नाही.


नांदेड मनपामध्ये भाजपाचे ‘अशोक पर्व!’


नांदेड नगर परिषद ते नांदेड-वाघाळा महानगरपालिका या प्रवासाच्या अमृतमहोत्सवी पर्वाकडे वाटचाल करणाऱ्या शहराच्या या मध्यवर्ती संस्थेमध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या पूर्वीच्या काँग्रेस पक्षाला हद्दपार करत भाजपाचे कमळ फुलविण्याची अवघड मोहीम शुक्रवारी फत्ते केली. कमळ फुलल्याचा शहरभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


या मनपाच्या २० प्रभागांतील ८१ जागांपैकी भाजपाने ६६ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ४५ जागा जिंकून संस्मरणीय विजयाची नोंद केली. गेल्या निवडणुकीत मनपातून हद्दपार झालेल्या एमआयएमने दमदार पुनरागमन करत २४ वर्षे सत्ता गाजविणाऱ्या नेतृत्वहिन काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर फेकले आहे. दोन आमदार असूनही शिवसेनेची तसेच प्रचारादरम्यान नांदेडचा कारभारी बदलण्याचा नारा देणार्या राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीमध्ये धुळदाण उडाली.

Comments
Add Comment

Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या

Asiatic Library: एशियाटिक लायब्ररीच्या संवर्धनासाठी ५.६३ कोटींची कामे; जुलैअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एशियाटिक लायब्ररीच्या जतनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ५६३.३३ लाखांचा निधी मंजूर मुंबई : राज्याच्या

AI Smart Glasses : एआय स्मार्ट चष्म्यांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकार स्थापन करणार तज्ज्ञ समिती

AI Smart Glasses : मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्मार्ट चष्मे, स्मार्ट गॉगल्स आणि इतर वेअरेबल (अंगावर परिधान करता

Bishnoi : बिश्नोई टोळीसह भाडोत्री गुंडांचा बंदोबस्त करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परदेशातील 'व्हीपीएन कॉल्स' आणि 'मास्किंग'चे जाळे उद्ध्वस्त करणार मुंबई : परदेशात

Uday Samant : मुंबईतील अनधिकृत नळजोडण्यांवर ९० दिवसांत होणार मोठी कारवाई

पाणीचोरी रोखण्यासाठी सरकारची विशेष मोहीम - मंत्री सामंत मुंबई : मुंबई शहरातील पाणीटंचाई आणि पाणीचोरीच्या

विकास करार रद्द झाल्यास मुद्रांक शुल्क परतावा बंद

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर; महसुलाचे नुकसान टाळण्यासह तरतुदींचा गैरवापर