परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल पेटली आहे. काँग्रेसच्या मदतीने ‘उबाठा’ शिवसेना निर्विवाद बहुमतापर्यंत जाऊन पोहोचली असून भारतीय जनता पक्षाला केवळ बारा जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या असून जनसुराज्य पक्षाला ४, यशवंत सेना १, अपक्ष १ असे महापालिकेतील पक्षीय बलाबल आहे. तब्बल २५ जागा मिळवून उबाठा शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.


काँग्रेस पक्षासोबत उबाठाची निवडणूकपूर्व आघाडी झाल्याने आणि काँग्रेसला १२ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आघाडी मिळवली होती. यावेळी वरपूडकरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तरीही त्यांच्या या प्रवेशाचा भाजपला कोणताही फायदा झाला नाही.


नांदेड मनपामध्ये भाजपाचे ‘अशोक पर्व!’


नांदेड नगर परिषद ते नांदेड-वाघाळा महानगरपालिका या प्रवासाच्या अमृतमहोत्सवी पर्वाकडे वाटचाल करणाऱ्या शहराच्या या मध्यवर्ती संस्थेमध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या पूर्वीच्या काँग्रेस पक्षाला हद्दपार करत भाजपाचे कमळ फुलविण्याची अवघड मोहीम शुक्रवारी फत्ते केली. कमळ फुलल्याचा शहरभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


या मनपाच्या २० प्रभागांतील ८१ जागांपैकी भाजपाने ६६ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ४५ जागा जिंकून संस्मरणीय विजयाची नोंद केली. गेल्या निवडणुकीत मनपातून हद्दपार झालेल्या एमआयएमने दमदार पुनरागमन करत २४ वर्षे सत्ता गाजविणाऱ्या नेतृत्वहिन काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर फेकले आहे. दोन आमदार असूनही शिवसेनेची तसेच प्रचारादरम्यान नांदेडचा कारभारी बदलण्याचा नारा देणार्या राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीमध्ये धुळदाण उडाली.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र