Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे फायरब्रँड नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या विजयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीला दिले आहे.



मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर मोहोर


नितेश राणे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांचे विशेष कौतुक केले आहे. "राज्यातील महापालिका निवडणुकीत मिळालेले दणदणीत यश हे जनतेच्या प्रचंड विश्वासाचे प्रतीक आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसह राज्यभरात महायुतीने जो विजय मिळवला आहे, त्यामागे मुख्यमंत्री महोदयांचे दूरदृष्टीपूर्ण आणि ठाम नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे," अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची पावती दिली.



मुंबईत परिवर्तनाचा नवा अध्याय


मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांची सत्ता उलथवून महायुतीने बहुमताचा आकडा (११८ जागा) पार केला आहे. या विजयाचा उल्लेख करताना नितेश राणे म्हणाले की, हा विजय महाराष्ट्राच्या विकासाचा आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरेल. महायुतीच्या या विजयामुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या विकासाला आता नवी गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ


केवळ नेतृत्वच नाही, तर तळागाळातील कार्यकर्त्यांचेही नितेश राणे यांनी आभार मानले आहेत. महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष, पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळेच विरोधकांना धूळ चारणे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले. भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर 'जय श्री राम' लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे