मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी पाटील या बेंगळुरूहून कोल्हापूरकडे परतत असताना आज पहाटे त्यांची इनोव्हा कार एका लॉरीला धडकली. धडक इतकी तीव्र होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वाहनांच्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
या अपघातामुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरोमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही घटनेची अधिक चौकशी केली जात आहे.