मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १० हजार ओळखपत्रे अभ्यागतांनी परत न केल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार प्रवेश संपल्यानंतर ही कार्डे जमा करणे आवश्यक असते; मात्र १० हजार कार्डे मंत्रालयाबाहेर गेल्याने आता प्रशासनाने ती परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.


राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपली कामे घेऊन मंत्रालयात येत असतात. त्यांना जलद प्रवेश मिळावा यासाठी अत्याधुनिक ‘डीजी ॲप’च्या माध्यमातून डिजिटल ओळखपत्रे वितरित केली जातात. मात्र, ही ओळखपत्रे घरी घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता कंत्राटदार कंपनीने तांत्रिक डेटाच्या आधारे अशा व्यक्तींशी संपर्क साधणे सुरू केले आहे.


ज्या अभ्यागतांकडे ओळखपत्रे राहिली आहेत, त्यांना थेट फोन करून कार्ड परत करण्याची विनंती केली जात आहे. अभ्यागत कोणत्या कामासाठी आले होते आणि त्यांचा संपर्क क्रमांक काय, याची संपूर्ण नोंद संगणकीय प्रणालीत उपलब्ध असल्याने संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचणे प्रशासनाला सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, या संवाद प्रक्रियेला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे ३०० कार्ड्स परत जमा करण्यात आली आहेत.



प्रवेशासाठी नवे नियम


या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, यापुढे ज्या नागरिकांकडे जुने ओळखपत्र राहिले आहे, त्यांना ते जमा केल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक कार्डाचे ट्रॅकिंग केले जात असून, अभ्यागतांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी

Devendra Fadnavis : महाराष्ट्र करणार अणुऊर्जा क्षेत्रात देशाचे नेतृत्व

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा