मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १० हजार ओळखपत्रे अभ्यागतांनी परत न केल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार प्रवेश संपल्यानंतर ही कार्डे जमा करणे आवश्यक असते; मात्र १० हजार कार्डे मंत्रालयाबाहेर गेल्याने आता प्रशासनाने ती परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.


राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपली कामे घेऊन मंत्रालयात येत असतात. त्यांना जलद प्रवेश मिळावा यासाठी अत्याधुनिक ‘डीजी ॲप’च्या माध्यमातून डिजिटल ओळखपत्रे वितरित केली जातात. मात्र, ही ओळखपत्रे घरी घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता कंत्राटदार कंपनीने तांत्रिक डेटाच्या आधारे अशा व्यक्तींशी संपर्क साधणे सुरू केले आहे.


ज्या अभ्यागतांकडे ओळखपत्रे राहिली आहेत, त्यांना थेट फोन करून कार्ड परत करण्याची विनंती केली जात आहे. अभ्यागत कोणत्या कामासाठी आले होते आणि त्यांचा संपर्क क्रमांक काय, याची संपूर्ण नोंद संगणकीय प्रणालीत उपलब्ध असल्याने संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचणे प्रशासनाला सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, या संवाद प्रक्रियेला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे ३०० कार्ड्स परत जमा करण्यात आली आहेत.



प्रवेशासाठी नवे नियम


या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, यापुढे ज्या नागरिकांकडे जुने ओळखपत्र राहिले आहे, त्यांना ते जमा केल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक कार्डाचे ट्रॅकिंग केले जात असून, अभ्यागतांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी ! तळेगाव MIDC मध्ये 'मृत्यूचा गॅस'! कंपनीत CO₂ गळतीने दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Pune Breaking News : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात आज एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तळेगाव

Jalgaon Crime : अमली पदार्थांचे व्यसन, मुलीवर अत्याचार, आता प्रशासनाकडून कारवाईचा बडगा ; जळगावात काय घडतंय ?

Jalgaon Crime : जळगाव शहरात अल्पवयीन मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक

Farmer Loan : २०१७ आणि २०१९ मधील पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ

मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब; अतिरिक्त १४ हजार कोटींचा भार पडणार मुंबई : २०१७ आणि २०१९ मधील कर्जमाफी

Virar News : मोबाईल कॅमेऱ्याच्या झूममुळे उलगडलं रहस्य; विरारच्या डोंगरात झाडाला लटकलेला तरुणाचा मृतदेह आढळला

विरार : विरार (Virar) तालुक्यातील मांडवी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काशीद कोपर येथील कुलस्वाई माता

Jalgaon : मुलीच्या साखरपुड्यापूर्वी आईने मांडला प्रियकरासोबत डाव ; मोबाईल स्टेटसमुळे उघडकीस आला प्रकार

जळगाव: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर (Jamner) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा साखरपुडा अवघ्या काही

Thane Accident : बदलापूरमध्ये पदाधिकाऱ्याच्या दुचाकीला कारची धडक; घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

ठाणे : ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूरमध्ये मनसे (MNS) पदाधिकारी राजेश शेटे (Rajesh Shete) यांच्या दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला