महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी विद्यमान अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात शड्डू ठोकला असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


वास्तविक महायुती आणि ठाकरेंमधील सत्तासंघर्षात काँग्रेसचा निभाव लागेल की नाही, याबाबत काँग्रेस नेत्यांच्या मनातच साशंकता होती. परंतु, काँग्रेसने २४ जागांपर्यंत मजल मारली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे वर्षा गायकवाड स्वतःची पाठ थोपटून घेत असताना, भाई जगताप यांनी गायकवाड यांच्यामुळे पक्ष चांगली कामगिरी करू शकला नसल्याचा आरोप केला आहे. “मुंबईत अपेक्षित न मिळण्यास नेतृत्वच जबाबदार आहे. प्रभावी रणनीतीचा अभाव आणि कमकुवत संघटनेमुळे मुंबईत पक्षाची ताकद कमी झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पक्षाला जागा कमी मिळाल्या आहेत. या निकालांचे विश्लेषण केल्यास नेतृत्वातील त्रुटी स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावे”, असे जगताप यांनी म्हटले आहे.



जगताप-गायकवाड यांच्यातील संघर्ष


या वादाला केवळ पालिका निवडणुकीतील पराभव नव्हे, तर पक्षांतर्गत संघर्षही कारणीभूत आहे. वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडल्यापासून पक्षावर एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या नादात त्यांनी अनेकांना दुखावले. प्रिया दत्त, संयज निरुपम, भाई जगताप, मिलिंद देवरा, अशी अनेक नावे सांगता येतील. भाई जगताप यांची खुर्ची काढून हायकमांडने गायकवाड यांना अध्यक्षपदावर बसवले. तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला, तो आजतागायत कायम आहे.

Comments
Add Comment

Chandrapur News : चंद्रपुरात धक्कादायक घटना! नशेत असलेल्या आई-वडिलांकडून ४ महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडले

चंद्रपूर : दारूच्या नशेत (Alcohol Intoxication) दुचाकी (Two-Wheeler) चालवणाऱ्या आई-वडिलांच्या निष्काळजीपणामुळे चार महिन्यांचे बाळ

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

Rohit Shetty : रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! २० कोटींच्या खंडणीची मागणी; बिश्नोई गँगचं कनेक्शन तपासात

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर