महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी विद्यमान अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात शड्डू ठोकला असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


वास्तविक महायुती आणि ठाकरेंमधील सत्तासंघर्षात काँग्रेसचा निभाव लागेल की नाही, याबाबत काँग्रेस नेत्यांच्या मनातच साशंकता होती. परंतु, काँग्रेसने २४ जागांपर्यंत मजल मारली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे वर्षा गायकवाड स्वतःची पाठ थोपटून घेत असताना, भाई जगताप यांनी गायकवाड यांच्यामुळे पक्ष चांगली कामगिरी करू शकला नसल्याचा आरोप केला आहे. “मुंबईत अपेक्षित न मिळण्यास नेतृत्वच जबाबदार आहे. प्रभावी रणनीतीचा अभाव आणि कमकुवत संघटनेमुळे मुंबईत पक्षाची ताकद कमी झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पक्षाला जागा कमी मिळाल्या आहेत. या निकालांचे विश्लेषण केल्यास नेतृत्वातील त्रुटी स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावे”, असे जगताप यांनी म्हटले आहे.



जगताप-गायकवाड यांच्यातील संघर्ष


या वादाला केवळ पालिका निवडणुकीतील पराभव नव्हे, तर पक्षांतर्गत संघर्षही कारणीभूत आहे. वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडल्यापासून पक्षावर एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या नादात त्यांनी अनेकांना दुखावले. प्रिया दत्त, संयज निरुपम, भाई जगताप, मिलिंद देवरा, अशी अनेक नावे सांगता येतील. भाई जगताप यांची खुर्ची काढून हायकमांडने गायकवाड यांना अध्यक्षपदावर बसवले. तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला, तो आजतागायत कायम आहे.

Comments
Add Comment

Dhule crime : तुझ्या आईचे गावात बऱ्याच लोकांशी प्रेमसंबंध, म्हणून... पतीस जन्मठेप ; नेमकं काय घडलं होतं ?

Dhule crime : अनैतिक संबंधाचा संशय घेऊन पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साक्री

Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोसळले झाड , ८ ते १० वाहनांचे नुकसान

Nashik News : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय (Nashik Collector Office) परिसरात भलेमोठे लिंबाचे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. येथील

India Post : पोस्ट ऑफिसची दमदार योजना! दरमहा फक्त 2 हजार रुपयांची गुंतवणूक उभी करेल सव्वा लाखांहून अधिकचा फंड

नवी दिल्ली: भविष्यातील आर्थिक सुरक्षा आणि चांगल्या परताव्यासाठी सुरक्षित गुंतवणूक मानली जाणारी पोस्ट ऑफिसची

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी तीन रस्त्यांकरिता ८,५०० कोटींचा निधी मंजूर

Nashik Kumbh Mela : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकासकामानी वेग घेतला आहे. काही महिन्यांवर येऊन

Marathi Web Series : हृता दुर्गुळेची 'अगं आई, अहो आई'; सासू-सुनेच्या नात्याचा सकारात्मक चेहरा दाखवणारी वेब सीरिज

मुंबई : सासू-सुनेच्या (Mother-in-law & Daughter-in-law) नात्यावर आधारित अनेक मालिका (Serials) आणि सिनेमे (Movies) प्रेक्षकांनी पाहिले आहेत.

Dry day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! आषाढी एकादशीमुळे सर्व दारूची दुकाने, वाईन्स शॉप्स राहणार बंद

मुंबई: उद्या शनिवार 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीनिमित्त मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे (Dry Day) पाळला जात आहे.