मीरा-भाईंदरमध्ये भाजपची एकहाती सत्ता

१८ दिग्गज माजी नगरसेवकाचा पराजय


भाईंदर : भारतीय जनता पक्षाने सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीची पुनरावृत्ती करत स्पष्ट बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे. भाजपचे ७८ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात भाजपचे १३ उच्च शिक्षित युवा उमेदवार सुध्दा विजयी झाले आहेत. तर एका माजी महापौरांना मतदारांनी घरी बसवले आहे. तर १८ दिग्गज माजी नगरसेवकांचा पराजय झाला आहे यात शिवसेना, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचा समावेश आहे.


मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळ पासून सुरू झाली होती, अगदी पहिल्याच फेरी पासून भाजपाने आघाडी घेतली होती. सुरवातीला जाहीर झालेल्या ६ पॅनल म्हणजे २४ जागा जिंकून भाजपाने नुसतेच खाते उघडले नाही तर पुढेही विजयाची आघाडी सुरूच ठेवली. आणि अखेर ७८ जागांवर विजय मिळवत मीरा भाईंदर महापालिकेत एक हाती सत्ता काबीज केली आहे.


मीरा भाईंदरमध्ये ८लाख १९ हजार १५१ मतदार होते. आणि मतदान ४८.६४ टक्के झाले होते. भाजपाने ९५ जागांपैकी ८७ जागा लढविल्या होत्या आणि ८ जागा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ला सोडल्या होत्या. आणि ८७ जागांपैकी ७८ जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या महापालिकेत २२ जागा असलेल्या शिवसेनेला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर १२ जागा असलेल्या काँग्रेसची एक जागा वाढून १३ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, उबाठा यांना खाते सुध्दा उघडण्यात यश मिळाले नाही.




  • शिवसेना, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराभूत

  • भाजपचे सर्व उच्चशिक्षित युवा उमेदवार विजयी


जनतेने पुन्हा एकदा विकासाला साथ दिली आहे. आता शहराला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार. भाजपने विकासाचा मुद्दा मांडला तर इतर पक्ष फक्त मोठमोठ्या गप्पा मारत बसले.
- नरेंद्र मेहता, आमदार


पक्षीय बलाबल :


भाजप ७८


काँग्रेस १३


शिवसेना ३


अपक्ष १

Comments
Add Comment

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे

Mira Road Forced Conversion : लग्नाचे आमिष, धर्मांतराची सक्ती अन् अमानुष मारहाण! मिरा रोडमध्ये हिंदू तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार

मुंबई (Mira Road Forced Conversion Case) : मुंबईलगतच्या मिरा रोड (Mira Road) परिसरातील काशीमीरा येथे एका हिंदू तरुणीची मुस्लिम युवकाकडून

Kalyan Crime : प्रेमविवाहाचा राग मनातच ठेवला; साखरपुडा मोडून लग्न केलेल्या मुलीची वडिलांनी केली हत्या

Crime News : कल्याण शहरात नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका

Pune Fugewadi Suspicious Death : तुकाराम मुंढेंचा धडाका! पुण्यात २२ बळी घेणाऱ्या विषारी दारूकांडाचे 'भिवंडी कनेक्शन' उघड;

'रेक्स इंटरनॅशनल'वर छापा टाकत हजारो किलो मिथेनॉल जप्त पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) परिसरात गावठी