मीरा-भाईंदरमध्ये भाजपची एकहाती सत्ता

१८ दिग्गज माजी नगरसेवकाचा पराजय


भाईंदर : भारतीय जनता पक्षाने सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीची पुनरावृत्ती करत स्पष्ट बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे. भाजपचे ७८ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात भाजपचे १३ उच्च शिक्षित युवा उमेदवार सुध्दा विजयी झाले आहेत. तर एका माजी महापौरांना मतदारांनी घरी बसवले आहे. तर १८ दिग्गज माजी नगरसेवकांचा पराजय झाला आहे यात शिवसेना, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचा समावेश आहे.


मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळ पासून सुरू झाली होती, अगदी पहिल्याच फेरी पासून भाजपाने आघाडी घेतली होती. सुरवातीला जाहीर झालेल्या ६ पॅनल म्हणजे २४ जागा जिंकून भाजपाने नुसतेच खाते उघडले नाही तर पुढेही विजयाची आघाडी सुरूच ठेवली. आणि अखेर ७८ जागांवर विजय मिळवत मीरा भाईंदर महापालिकेत एक हाती सत्ता काबीज केली आहे.


मीरा भाईंदरमध्ये ८लाख १९ हजार १५१ मतदार होते. आणि मतदान ४८.६४ टक्के झाले होते. भाजपाने ९५ जागांपैकी ८७ जागा लढविल्या होत्या आणि ८ जागा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ला सोडल्या होत्या. आणि ८७ जागांपैकी ७८ जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या महापालिकेत २२ जागा असलेल्या शिवसेनेला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर १२ जागा असलेल्या काँग्रेसची एक जागा वाढून १३ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, उबाठा यांना खाते सुध्दा उघडण्यात यश मिळाले नाही.




  • शिवसेना, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराभूत

  • भाजपचे सर्व उच्चशिक्षित युवा उमेदवार विजयी


जनतेने पुन्हा एकदा विकासाला साथ दिली आहे. आता शहराला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार. भाजपने विकासाचा मुद्दा मांडला तर इतर पक्ष फक्त मोठमोठ्या गप्पा मारत बसले.
- नरेंद्र मेहता, आमदार


पक्षीय बलाबल :


भाजप ७८


काँग्रेस १३


शिवसेना ३


अपक्ष १

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच