जळगावकर म्हणतायत.. तुमची आमची भाजपा सर्वांची! भाजपचा हा नेता ठरला धुरंधर

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात शतप्रतिशत विजय मिळवला आहे. पालिकेतील एकूण ४६ जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते आणि विशेष बाब म्हणजे प्रत्येक जागेवर पक्षाला विजय मिळाला. या निकालामुळे जळगावमध्ये भाजपचा प्रभाव अधिक ठळकपणे समोर आला आहे.

या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नाशिक या महापालिकांमध्ये पक्षाला मजबूत कामगिरी करता यावी यासाठी त्यांनी आखलेली रणनीती निर्णायक ठरल्याचे चित्र आहे.

धुळे महापालिकेतही भाजप अनेक प्रभागांमध्ये आघाडीवर असून, सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. नाशिकमध्येही भाजपने प्रभावी कामगिरी केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच पालिकांमध्ये भाजपची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.

जळगाव महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांचे मिळून काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर ही संख्या वाढली. यामुळे निवडणुकीआधीच पक्षांना बळ मिळाले होते. या निकालांमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपची पकड अधिक घट्ट होत असल्याचे स्पष्ट झाले असून, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची आणि राजकीय अनुभवाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील

Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण