नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ


नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत १ लाखांपेक्षा अधिक प्रवासी नोंदवून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. २५ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान विमानतळाने १ लाख ९ हजार ९१७ प्रवाशांची सेवा केली, त्यापैकी ५५,९३४ आगमन आणि ५३,९८३ प्रस्थान करणारे होते. विमानतळानुसार १० जानेवारी हा दिवस सर्वाधिक व्यस्त होता, ज्यावेळी ७ हजार ३४५ प्रवाशांचा प्रवासी नोंदवण्यात आले आहेत.


विमानतळाने २५ डिसेंबर पासून एकूण ७३४ हवाई वाहतूक हालचाली (एटीएमएस) हाताळल्या, ज्यात ३२ सामान्य नागरी विमान सेवा संबंधित हालचाली होत्या. विमानतळानुसार प्रत्येक आगमन किंवा प्रस्थानाला एक एटीएम म्हणून मोजले जाते. दिल्ली, गोवा आणि बेंगळुरू हे ठिकाणे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अग्रक्रमावर होते. विमानतळाने २२.२१ टन कार्गो देखील हाताळला.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एनएमआयए) करत असून, हे अडानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) आणि सिडको या महाराष्ट्र सरकारच्या विकास संस्थेच्या संयुक्त उपक्रमाने विकसित केले आहे. एएएचएलकडे ७४% हिस्सा असून सिडकोकडे उरलेला हिस्सा आहे.


विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आधुनिक सुविधा, सुव्यवस्थित प्रक्रिया आणि कार्यक्षमतेवर लक्ष देऊन एनएमआयए हळूहळू सेवा वाढवत आहे, तसेच सुरक्षा, सेवा गुणवत्ता आणि प्रवाशांचा अनुभव उच्च स्तरावर राखत आहे.” एएएचएलकडे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड चे संचालन देखील आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) चालवते.

Comments
Add Comment

Randhir Singh Passes Away : एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकणारे दिग्गज नेमबाज रणधीर सिंग यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्राला समृद्ध करणारे आणि जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करणारे दिग्गज

श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त उरुळी स्थानकावर १६ गाड्यांना तात्पुरता थांबा

उरुळी : जून २०२६ मध्ये उरुळी येथे होणाऱ्या श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त

Asaram Bapu :आसाराम बापूला हायकोर्टाचा मोठा झटका

Asaram Bapu : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आसाराम बापू याला हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. आसाराम बापू याला

BCCI UPDATE : IPL मध्ये होणार सर्वात मोठा बदल? वर्षातून दोनदा रंगणार क्रिकेटचा महाकुंभ; BCCI ची नव्या प्लॅनवर चर्चा

MUMBAI : जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग असलेल्या आयपीएलमध्ये आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय

Byju Raveendran Case : बायजूसच्या संस्थापकाला मोठा धक्का! सिंगापूर कोर्टाने सुनावली ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

सिंगापूर : एकेकाळी भारतातील सर्वात यशस्वी एडटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या 'बायजूस' (Byju's) चे संस्थापक बायजू रवींद्रन

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.