नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ


नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत १ लाखांपेक्षा अधिक प्रवासी नोंदवून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. २५ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान विमानतळाने १ लाख ९ हजार ९१७ प्रवाशांची सेवा केली, त्यापैकी ५५,९३४ आगमन आणि ५३,९८३ प्रस्थान करणारे होते. विमानतळानुसार १० जानेवारी हा दिवस सर्वाधिक व्यस्त होता, ज्यावेळी ७ हजार ३४५ प्रवाशांचा प्रवासी नोंदवण्यात आले आहेत.


विमानतळाने २५ डिसेंबर पासून एकूण ७३४ हवाई वाहतूक हालचाली (एटीएमएस) हाताळल्या, ज्यात ३२ सामान्य नागरी विमान सेवा संबंधित हालचाली होत्या. विमानतळानुसार प्रत्येक आगमन किंवा प्रस्थानाला एक एटीएम म्हणून मोजले जाते. दिल्ली, गोवा आणि बेंगळुरू हे ठिकाणे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अग्रक्रमावर होते. विमानतळाने २२.२१ टन कार्गो देखील हाताळला.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एनएमआयए) करत असून, हे अडानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) आणि सिडको या महाराष्ट्र सरकारच्या विकास संस्थेच्या संयुक्त उपक्रमाने विकसित केले आहे. एएएचएलकडे ७४% हिस्सा असून सिडकोकडे उरलेला हिस्सा आहे.


विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आधुनिक सुविधा, सुव्यवस्थित प्रक्रिया आणि कार्यक्षमतेवर लक्ष देऊन एनएमआयए हळूहळू सेवा वाढवत आहे, तसेच सुरक्षा, सेवा गुणवत्ता आणि प्रवाशांचा अनुभव उच्च स्तरावर राखत आहे.” एएएचएलकडे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड चे संचालन देखील आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) चालवते.

Comments
Add Comment

Maharashtra Revenue Department : महसूल विभागाच्या अभियानात ३,४३६ महिलांना शेतकरी दर्जा; ६ दिवसांत ४.३५ लाख नागरिकांना योजनांचा लाभ

मुंबई: महसूल विभागाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत

Titamba Ashram School : टिटंबा आश्रमशाळेतील विषबाधाप्रकरणी अखेर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

अमरावती : मेळघाटातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना अन्नातून

SIR : 'एसआयआर' प्रक्रियेत नाव वगळल्यास मतदाराला मिळणार पुन्हा संधी

१७ ऑगस्टला प्रारूप यादी; १६ सप्टेंबरपर्यंत पुनर्नोंदणीची मुदत मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार

PMSBY : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, फक्त २० रुपयांत २ लाखांचा अपघात विमा

PMSBY : PMSBY म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ही भारतातील एक सरकारी अपघात विमा योजना आहे जी अपघाती मृत्यू आणि

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर