नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ


नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत १ लाखांपेक्षा अधिक प्रवासी नोंदवून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. २५ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान विमानतळाने १ लाख ९ हजार ९१७ प्रवाशांची सेवा केली, त्यापैकी ५५,९३४ आगमन आणि ५३,९८३ प्रस्थान करणारे होते. विमानतळानुसार १० जानेवारी हा दिवस सर्वाधिक व्यस्त होता, ज्यावेळी ७ हजार ३४५ प्रवाशांचा प्रवासी नोंदवण्यात आले आहेत.


विमानतळाने २५ डिसेंबर पासून एकूण ७३४ हवाई वाहतूक हालचाली (एटीएमएस) हाताळल्या, ज्यात ३२ सामान्य नागरी विमान सेवा संबंधित हालचाली होत्या. विमानतळानुसार प्रत्येक आगमन किंवा प्रस्थानाला एक एटीएम म्हणून मोजले जाते. दिल्ली, गोवा आणि बेंगळुरू हे ठिकाणे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अग्रक्रमावर होते. विमानतळाने २२.२१ टन कार्गो देखील हाताळला.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एनएमआयए) करत असून, हे अडानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) आणि सिडको या महाराष्ट्र सरकारच्या विकास संस्थेच्या संयुक्त उपक्रमाने विकसित केले आहे. एएएचएलकडे ७४% हिस्सा असून सिडकोकडे उरलेला हिस्सा आहे.


विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आधुनिक सुविधा, सुव्यवस्थित प्रक्रिया आणि कार्यक्षमतेवर लक्ष देऊन एनएमआयए हळूहळू सेवा वाढवत आहे, तसेच सुरक्षा, सेवा गुणवत्ता आणि प्रवाशांचा अनुभव उच्च स्तरावर राखत आहे.” एएएचएलकडे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड चे संचालन देखील आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) चालवते.

Comments
Add Comment

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०

'उबाठा' पुन्हा फुटली; सहा खासदार शिंदेंच्या गळाला

संजय राऊत यांचाही दुजोरा; एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत दाखल मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या तोंडावर

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Sanchita Suicide Case : संचिता उगले आत्महत्या प्रकरणात आता नव्हे वळण ; मैत्रिणीने सांगितलं एक नवीन सत्य

मुंबई : टीव्हीविश्वात निवडक भूमिका केलेल्या २२ वर्षांच्या संचिता उगलेने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण