Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालन्यातून विजयी, राजकीय पक्षांच्या दिग्गजांना चारली धूळ

जालना : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालांत जालन्यातून एक धक्कादायक आणि चर्चेचा निकाल समोर आला आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून अपक्ष उमेदवार म्हणून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयामुळे जालन्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.



अटीतटीच्या लढतीत बाजी



श्रीकांत पांगारकर यांनी या निवडणुकीत २ हजार ६२१ मते मिळवत आपला विजय निश्चित केला. या प्रभागात भारतीय जनता पक्षासह इतर प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार मैदानात होते. विशेष म्हणजे, येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार रिंगणात नव्हता. पांगारकर यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांना मागे टाकत अपक्ष म्हणून मतदारांचा कौल आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले.



विजयाचा जल्लोष आणि 'तो' संदेश


विजय घोषित होताच पांगारकर यांनी आपल्या समर्थकांसह गुलालाची उधळण करत आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. स्वतः पांगारकर कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून नाचताना दिसले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "माझ्यावर आरोप आहेत पण ते अद्याप सिद्ध झालेले नाहीत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जनतेने दिलेला हा निकाल म्हणजे माझ्यासाठी 'जनतेच्या न्यायालयातील' न्याय आहे."



पांगारकर यांचा राजकीय प्रवास आणि वाद


श्रीकांत पांगारकर हे यापूर्वी २००१ ते २००६ या काळात शिवसेनेचे नगरसेवक राहिले आहेत. मात्र, २०११ मध्ये तिकीट न मिळाल्याने त्यांनी हिंदू जनजागृती समितीत प्रवेश केला होता. २०१८ मध्ये एटीएसने त्यांना स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्ती प्रकरणात अटक केली होती, ज्यामध्ये त्यांच्यावर युएपीए (UAPA) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना गौरी लंकेश हत्या प्रकरणात जामीन मंजूर केला होता.



गौरी लंकेश हत्येचे सावट


५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरू येथे गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. या प्रकरणातील आरोपीने आता थेट निवडणुकीच्या मैदानात बाजी मारल्याने, या निकालाकडे सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून विशेष लक्ष दिले जात आहे.

Comments
Add Comment

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित