Nitesh Rane : हाहाहा, हीहीही..."उद्धवजी आणि पेग्विनला"; जय श्रीराम!"... नितेश राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

मुंबईत महायुतीची मुसंडी पाहताच भाजपचा प्रहार


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत महायुतीने (भाजप-शिंदे गट) निर्णायक आघाडी घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या विजयाचा आनंद साजरा करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची थेट खिल्ली उडवली आहे. नितेश राणे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात ते ठाकरे गटाच्या पराभवावर हसताना दिसत आहेत.



काय आहे 'त्या' व्हिडीओमध्ये?




नितेश राणे यांनी शेअर केलेल्या २२ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये ते अत्यंत आनंदात दिसत असून ठाकरे गटाच्या स्थितीवर हसत आहेत. "उद्धवजी आणि पेग्विनला जय श्रीराम" असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईत गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या ठाकरेंच्या सत्तेला यंदा सुरुंग लागल्याचे पाहून राणे यांनी हा 'विक्टरी' मोडमधील व्हिडीओ शेअर केला आहे.



"रडणाऱ्यांना मुंबईकरांनी नाकारलं"...


निकालांवर भाष्य करताना नितेश राणे यांनी मंत्र्यांच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. "उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या दिवशी शाई पुसल्याचे जे रडगाणे गायले होते, त्याला मुंबईकरांनी चोख उत्तर दिले आहे. मुंबईकरांनी काम करणाऱ्या 'महायुती'ला पसंती दिली असून, घरात बसून राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे," असे राणे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र येऊनही महायुतीला रोखू शकले नाहीत, याकडे नितेश राणे यांनी लक्ष वेधले. "२० वर्षांनंतर दोन भाऊ एकत्र आले तरीही त्यांना १०० चा आकडाही गाठता आला नाही. हेच महायुतीचे यश आणि त्यांच्या नेतृत्वाचे अपयश आहे," अशी बोचरी टीका त्यांनी केली. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून नितेश राणे यांच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्