पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल


मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ३० दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला असून त्यामुळे दररोज शेकडो लोकल फेऱ्या रद्द होत आहेत. शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेऊन कामे केली जाणार असल्याने या ब्लॉकमुळे तब्बल २४० लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. त्यामुळे या मार्गावरील प्रवास गैरसोयीचा ठरणार आहे.


गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेवर खार रोड ते कांदिवलीपर्यंत सहावी मार्गिका सुरू करण्यात आली. आता कांदिवली ते बोरिवलीपर्यंत सहावी मार्गिका वाढविण्यात येत आहे. या नवीन मार्गिकेमुळे लोकल सेवेचा वक्तशीरपणा वाढविणे आणि लोकल फेऱ्या वाढविणे शक्य होईल. कांदिवली ते बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने २० डिसेंबर २०२५ च्या रात्रीपासून ३० दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक १८ जानेवारीपर्यंत असेल. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तसेच काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल केला आहे. तर, काही लोकल सेवा रद्द केल्या आहेत.


पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली ते मालाड दरम्यान अप जलद मार्गावर शुक्रवार आणि शनिवारी रात्री ११.१५ ते रात्री ३.१५ आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १ ते पहाटे ४.३० वाजेर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या कालावधीत पाचवा मार्ग बंद केल्यामुळे तसेच वेगमर्यादा लागू केल्यामुळे लोकल सेवा रद्द राहतील. त्यात १२ डबा लोकल, १५ डबा लोकल आणि वातानुकूलित लोकलचा समावेश आहे.


जलद लोकलवरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा


पश्चिम रेल्वेवरील वाढत्या प्रवाशांसाठी लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. मर्यादित मार्ग असल्याने लोकल सेवा वाढविणे शक्य होत नाही. वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यान लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी एक स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील खार रोड ते गोरेगावपर्यंत सहावी मार्गिका होती. गेल्यावर्षी कांदिवलीपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला. बोरिवलीपर्यंत सहावी मार्गिका वाढविण्यात येईल. या नवीन मार्गिकेमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल. या मार्गिकेमुळे खार ते बोरिवली दरम्यानच्या जलद लोकलवरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व