भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या अहवालानुसार भारतीय पासपोर्टच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून भारत आता ८० व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पायऱ्यांची मोठी झेप घेतली असून आता भारतीय नागरिकांना जगातील ५५ देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधेद्वारे प्रवास करता येणार आहे. भारताची ही प्रगती देशाच्या मजबूत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रतीक मानली जात आहे.


या जागतिक क्रमवारीत सिंगापूर १९२ देशांच्या सुविधेसह पहिल्या स्थानावर आहे, तर जपान आणि दक्षिण कोरिया दुसऱ्या स्थानी आहेत. भारताने आपल्या शेजारील देशांच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली असून पाकिस्तान ९८ व्या तर बांगलादेश ९५ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भारतीय पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले थायलंड, मलेशिया आणि मॉरिशस यांसारख्या देशांनी भारतीय पर्यटकांना व्हिसाच्या कटकटीतून मुक्त केले आहे. यामुळे आता कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय केवळ पासपोर्ट घेऊन या देशांची सफर करणे शक्य होणार आहे.


या वाढीव सुविधेचा फायदा आशिया, आफ्रिका, ओशनिया, कॅरिबियन आणि मध्य पूर्वेतील अनेक भागांमधील भारतीय प्रवाशांना होईल. लोकप्रिय व्हिसा-मुक्त देशांमध्ये थायलंड, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ, बार्बाडोस, फिजी, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि इतर समावेश आहे. व्हिसा-ऑन-अरायव्हल देशांमध्ये इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका, केनिया, जॉर्डन आणि फिलीपिन्स यांचा समावेश आहे. या सुविधेमुळे आता फॅमिली ट्रिप, हनिमून किंवा सुट्ट्यांच्या सहलींचे नियोजन करणे भारतीयांसाठी अधिक सुलभ होईल. प्रत्येक देशामध्ये राहण्याचा कालावधी हा १५ दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत वेगवेगळा असू शकतो. ही आनंदाची बातमी असली तरी पर्यटकांनी एका गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे की हे नियम आंतरराष्ट्रीय धोरणांनुसार बदलू शकतात, त्यामुळे प्रवासापूर्वी संबंधित देशाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासून घेणे सोयीचे ठरेल. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांसाठी अद्याप व्हिसाची गरज असली तरी ५५ देशांनी दिलेली ही सूट भारतीय पर्यटकांच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा पुरावा आहे.


जेव्हा आपण परदेश प्रवासाचा विचार करतो, तेव्हा व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया सर्वात कठीण असते. मात्र आता अंगोला, बार्बाडोस, भूतान, फिजी, जमैका, कझाकिस्तान, नेपाळ आणि सेनेगल यांसारख्या देशांमध्ये भारतीय पर्यटकांना थेट प्रवेश मिळणार आहे. याशिवाय इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका, कंबोडिया, कतार आणि सेशेल्स यांसारख्या देशांमध्ये पोहोचल्यानंतर विमानतळावरच व्हिसा मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. केनिया आणि म्यानमार सारख्या देशांनी इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन म्हणजेच ई-व्हिसाची सुविधा दिली आहे, ज्यामुळे घरबसल्या ऑनलाइन परवानगी मिळवणे सोपे झाले आहे.


Comments
Add Comment

Israel - Iran War : भारतीय दूतावासाकडून इस्रायलमधील नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आंध्र प्रदेशच्या काकीनाड्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्हा येथील सामरलकोट मंडलमधील वेटलापालेम गावात एका फटाका निर्मिती

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील

National Science Day 2026 : विकास आणि कल्याणासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारताच्या

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या