Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भगवान अय्यप्पांच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या तुपाच्या विक्रीत लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले असून, केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (VACB) या प्रकरणाच्या तळाशी जाऊन एका महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. हा घोटाळा नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ च्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मंदिराच्या दक्षता अधिकाऱ्यांनी केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणात (Audit) पैशांची मोठी तफावत दिसून आली. या प्रकरणी त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे (TDB) काउंटर इन्चार्ज सुनील पोटी यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. भाविकांना दिल्या जाणाऱ्या 'आथिया षष्ठम' प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या हिशेबात ही गडबड झाली आहे.



असे आहे घोटाळ्याचे गणित


सबरीमाला मंदिरात भाविक नारळ आणि तूप अर्पण करतात, ज्याची पुनर्विक्री बोर्डाद्वारे १०० मिलीच्या पॅकेटमध्ये केली जाते. प्रत्येक पॅकेटची किंमत १०० रुपये निश्चित आहे.


विक्रीसाठी आलेली पाकिटे : १७ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर २०२५ दरम्यान ३,५२,०५० पाकिटे पॅक केली गेली.


विक्रीची नोंद : मराठमठ इमारतीतील काउंटरवरून ८९,३०० पाकिटांची विक्री झाल्याचे दाखवण्यात आले.


रुपयांचा हिशेब : नियमानुसार ८९,१२९ पाकिटांचे पैसे जमा व्हायला हवे होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी केवळ ७५,४५० पाकिटांचीच रक्कम जमा केली.


अपहार : तब्बल १३,६७९ पाकिटांचे पैसे, म्हणजेच अंदाजे १३ लाख ६७ हजार ९०० रुपये तिजोरीत जमा झालेच नाहीत.



न्यायालयाची कडक टिप्पणी


उच्च न्यायालयाने या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, "इतक्या कमी कालावधीत झालेली ही तफावत केवळ हिशेबातील चूक असू शकत नाही. यामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही." कंत्राटदाराला पाकीट बनवण्यासाठी मिळणारे २० पैसे आणि बोर्डाचे साहित्य असतानाही झालेला हा अपहार चिंताजनक आहे. आता या घोटाळ्याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहेत, हे दक्षता विभागाच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान