मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात


मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि मतमोजणीपर्यंतीची महत्त्वाची प्रक्रिया शांततेत, मोकळ्या आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवल्याचा दावा मंगळवारी मुंबई पोलिसांनी केला.


मंगळवारी संध्याकाळी ५ च्या ठोक्याला निवडणूक प्रचार थांबला. प्रत्यक्षात त्यानंतरच पैसेवाटप, वस्तू वाटप सुरू होते, या अनुभवामुळे दाट लोकवस्तीचे, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या प्रभागांमध्ये पोलिसांनी मंगळवार संध्याकाळपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत विशेष उपाययोजना आखल्या आहेत. यात गस्त वाढवणे, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबतचा समन्वय दृढ केल्याचे सांगण्यात आले. ठरावीक धर्म, समाज, भाषिक नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडूच नये या उद्देशाने ठरावीक राजकीय पक्ष स्वतःच्या सोयीने रणनिती आखतात. त्यामुळे त्या त्या प्रभागातील मतदानाचा टक्का घसरतो. असे प्रकार घडू नयेत, बोगस मतदान होऊ नये यासाठी सर्वत्र करडी नजर ठेवून आहोत, असे मुंबई पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आले.


ठाकरे बंधूंनी बोगस मतदान, दुबार मतदान टाळण्याच्या उद्देशाने भगवा गार्ड या नावाने कार्यकर्त्यांची फौज प्रत्येक मतदान केंद्राबाहेर तैनात ठेवू, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे निर्माण होणारा संघर्ष, राजकीय शत्रुत्वातून उद्भवणारी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले.


२५ हजार पोलीस तैनात : १५ जानेवारी रोजी आयुक्त देवेन भारती यांच्या थेट देखरेखीखाली १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपआयुक्त, ८४ सहायक आयुक्त यांच्यासह तीन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि २५ हजाराहून अधिक अंमलदार असा ताफा शहराच्या कानाकोपऱ्यात तैनात असेल. संवेदनशील प्रभागांमध्ये पोलीस बंदोबस्तासह एसआरपीएफ, क्युआरटी, बीडीडीएस, आरसीपी, गृहरक्षक दल आदी विशेष तुकड्या तैनात ठेवल्या जातील, असे सांगण्यात आले.


Comments
Add Comment

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.