कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल


मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी प्रशासनाने 'विनातिकीट' प्रवाशांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. गेल्या वर्षभरात (२०२५) राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमांमुळे कोकण रेल्वेच्या तिजोरीत दंडापोटी तब्बल २०.२७ कोटी रुपयांची भर पडली असून ३ लाख ६८ हजारांहून अधिक अनियमित प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे.


केवळ डिसेंबर २०२५ या एका महिन्यात रेल्वेने ९९८ मोहिमा राबवल्या. यामध्ये ४३,८९६ फुकट्या प्रवाशांकडून २.४५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती.


कोकण रेल्वेवर पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळुर ते उडुपीदरम्यान धावली. रोहा – वीर – खेड – सावंतवाडी या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्षे ३ महिने कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर १९९८-९९ सालापासून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यास सुरुवात झाली. कोकण रेल्वेवरून दर आठवड्याला ४३ ते ४५ नियमित गाड्या धावतात.


याशिवाय उन्हाळी सुट्ट्या आणि गणेशोत्सवाच्या काळात चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या ४ ते ५ हजारांपर्यंत जाते. अशा वेळी अधिकृत तिकीटधारकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक विशेष गाडीमध्ये तपासणी पथकाद्वारे कडक चेकिंग केले जात आहे.


वर्षभरातील मोहिमेचा लेखाजोखा (जानेवारी-डिसेंबर २०२५) :


कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या ७४० किमीच्या मार्गावर रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणी पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.


एकूण कारवाया : ८,४८१ विशेष तिकीट तपासणी मोहिमा.


पकडलेले प्रवासी : ३,६८,९०१ (अनधिकृत आणि अनियमित प्रवासी).


वसूल केलेला दंड : २० कोटी २७ लाख रुपये.

Comments
Add Comment

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील

Garib Nagar Demolition Day 2 : मोठी बातमी! वांद्र्यातील गरीब नगरमध्ये तणाव; पोलिसांवर बाटल्या फेकल्यानंतर लाठीचार्ज, कारवाई मात्र सुरूच राहणार

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Bandra East) परिसरातील 'गरीब नगर' (Garib Nagar) भागात सलग दुसऱ्या दिवशी तणावाचे वातावरण पाहायला