BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला निकाल प्रक्रिया सुरू होईल. मात्र मुंबई महापालिकेच्या निकालाबाबत यंदा वेगळी कार्यपद्धती राबवण्यात येणार असल्याने अंतिम चित्र स्पष्ट होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.


महानगरपालिकेतील सर्व वॉर्डांची मतमोजणी एकाच वेळी न करता ती नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे काही प्रभागांचे निकाल लवकर समोर येतील, तर काही ठिकाणी निकाल जाहीर होण्यासाठी संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.



२३ केंद्रांवर मतमोजणी, मर्यादित वॉर्ड एकावेळी


मुंबईत एकूण २३ ठिकाणी मतमोजणी केंद्रे कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक केंद्रावर अनेक वॉर्डांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात एकाच वेळी कमी संख्येतील वॉर्डांचीच मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात एकाच वेळेस सर्व वॉर्डांचे निकाल लागणार आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, या व्यवस्थेमुळे मनुष्यबळाचे योग्य नियोजन करता येणार असून मतमोजणी प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता राखणे सोपे होणार आहे.



निकाल जाहीर होण्यास उशीर संभवतो


या नव्या पद्धतीनुसार, मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांची मतमोजणी एकूण पाच टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक टप्प्यात ठरावीक संख्येतील वॉर्ड हाताळले जाणार असल्याने काही भागांचे निकाल दुपारनंतर तर काहींचे संध्याकाळपर्यंत समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे यंदा मुंबई महापालिकेच्या निकाल प्रक्रियेकडे राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र