शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून मिळवलेला फंड कुठे गेला?


अमित साटम यांचा राज ठाकरेंना सवाल; कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या?


मुंबई : "ठाकरेंनी १९९७ साली शिवउद्योग सेनेची स्थापना केली. फंड मिळवले. पण त्यातून किती तरुणांना उद्योग मिळाला? किती मराठी तरुणांना यांनी मोठे केले? याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी द्यावे. ठराविक एका उद्योगपतीला टार्गेट करणारे राज ठाकरे स्वतःची आर्थिक प्रगती कोहिनूर मॉलच्या माध्यमातून कशी झाली यावर कधी बोलणार आहेत? कोहिनूर मीलच्या जागेवर उभारलेल्या कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? याचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावे," असे आव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मंगळवारी दिले.


राज ठाकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना, "माझा कोणत्याही उद्योग-धंद्यांना विरोध नाही. मात्र एकाच उद्योगपतीने दहा वर्षांत एवढी मोठी झेप घेणं खटकतंय," असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना साटम म्हणाले, "काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा उघडकीस आणला. महाराष्ट्रात उद्योग कशाप्रकारे आले यावर विस्तृत विश्लेषण दिले. यावर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. उद्योगांना माझा विरोध नाही मात्र कमी वेळात मोठे होणाऱ्या उद्योगपतींवर माझा आक्षेप आहे असे म्हटले आहे. परंतु, मराठी तरुणांना उद्योजक बनवायची नीती देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मागची काही वर्षे करत आहेत. पण या ठाकरे बंधूंनी मराठी तरुणांना उद्योगाच्या नावाखाली वडापावाच्या गाडीपर्यंतच मर्यादित ठेवले आहे."


साटम म्हणाले, "राज ठाकरे नेहमी मराठीविषयी बोलत असतात. मात्र, या ठाकरेंची मुले मराठी शाळांमध्ये न जाता बॉम्बे स्कॉटिश नावाच्या शाळेत का शिकली? कॉलेजमध्ये त्यांनी जर्मन आणि फ्रेंच या भाषा का शिकल्या? याचेही उत्तर राज ठाकरेंनी द्यावे. मनाचा मोठेपणा जपणाऱ्या मराठी माणसाची बदनामी करणाऱ्या राज ठाकरेंना शेवटी मी खुले आव्हान देतोय, की त्यांनी आपल्या नातवाचा प्रवेश बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत घेऊन दाखवावा," असाही टोला साटम यांनी राज ठाकरेंना लगावला.


"अदानींबद्दल जर ठाकरेंचे ठाम मत असेल तर त्यांनी अदानींच्या गळाभेटी का घेतल्या? त्यांना घरी का बोलवलं? अदानींची कंपनी काही नवीन नाही. त्यामुळे एखाद्याला उगाचच टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे. भ्रष्टाचाराची भाषा करणाऱ्या ठाकरेंनी २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेत राहून कशाप्रकारे पापाचा पैसा लाटला हे सर्वश्रुत आहे. २०१९ नंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे", अशी टीका अमित साटम यांनी केली.


Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान