“वारसा सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांचे स्वप्न सोडले”

“गरिबांच्या घरांचे स्वप्न आम्हीच पूर्ण करणार” — मुंबई महापालिका प्रचारात शिंदेंचा थेट इशारा


दहिसर, बोरीवली, मागाठाणे, कांदिवली, मालाड, दिंडोशी आणि जोगेश्वरीतील प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



मुंबई : “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे गरिबांना, कष्टकरी व मुंबईकरांना हक्काची घरे देण्याचे स्वप्न होते. मात्र त्यांचा वारसा सांगणारेच हे स्वप्न विसरले आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम आम्ही करणार आहोत,” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.


आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दहिसर, बोरीवली, मागाठाणे, कांदिवली, मालाड, दिंडोशी आणि जोगेश्वरी मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. या प्रचार दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ठिकठिकाणी कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले होते.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महायुती सरकार सर्वसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीत राहणारे, गिरणी कामगार आणि भूमिपुत्रांसाठी काम करत आहे. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने सरकार ठोस पावले उचलत असून रमाबाई आंबेडकर नगरसह विविध ठिकाणी पुनर्विकास प्रकल्प वेगाने सुरू आहेत.


मुंबई आणि एमएमआर परिसरात गरिबांना आणि कष्टकरी वर्गाला घरे उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी केवळ घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्षात काम झाले नाही. आम्ही मात्र प्रत्यक्ष काम करून नागरिकांना लाभ देत असल्याचा दावा त्यांनी केला.


महायुती सरकारने सुरू केलेल्या “लाडकी बहीण” योजनेमुळे महिलांना व कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असून ही योजना बंद होणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, आरोग्य सुविधा तसेच काँक्रीट रस्त्यांची कामे प्राधान्याने केली जातील, असे ठोस आश्वासनही त्यांनी दिले.


महायुतीशिवाय मुंबईच्या विकासाला पर्याय नसल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार रवींद्र वायकर,आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुलांचे 'डिजिटल व्यसन' सुटणार! राज्य सरकारकडून तज्ज्ञांची 'टास्क फोर्स' नियुक्त; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

मुंबई : मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाबाबत आणि त्याचा होणारा दुष्परिणाम लक्षात घेता याबाबत अभ्यास

Legislative Council Election 2026 : कोणाचा पत्ता कटणार आणि कोणाला लॉटरी लागणार ? विधान परिषदेच्या 'या' ९ जागा होणार रिक्त!

मुंबई : येत्या १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी रणधुमाळी उडणार आहे. सध्याचे संख्याबळ

'रो-रो'च्या माध्यमातून महत्त्वाचे जिल्हे आणि राज्ये मुंबईशी जोडणार - मंत्री नितेश राणे यांची माहिती

जलमार्गांचे जाळे उभारण्याची मुख्यमंत्र्यांची संकल्पना सत्यात उतरवणार मुंबई : "शिमग्याच्या निमित्ताने कोकणात

मुंबईत २७,२८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा

Epstein Files : एपस्टाईन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर 'या' देशाच्या पंतप्रधानांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात एपस्टाईन फाइल्समुळे गोंधळ उडाला आहे. अशातच या फाइल्समध्ये नाव आलेल्या एका

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील