ठाकरे बंधूंच्या तोंडी जिहाद्यांची भाषा - मंत्री नितेश राणेंचा घणाघात; राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदान करण्याचे आवाहन

मुंबई : 'ठाकरे बंधूंची भाषा आणि जिहाद्यांच्या भाषेत आता काहीच फरक उरलेला नाही. 'व्होट जिहाद'च्या माध्यमातून हिंदू समाजाला डिवचण्याचे काम सुरू असून, राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदानातून या प्रवृत्तींना धडा शिकवावा", असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी केले.


नितेश राणे म्हणाले की, लोकसभेपासून सुरू झालेला धर्माच्या नावावर मते मागण्याचा प्रकार आता महानगरपालिका निवडणुकांपर्यंत पोहोचला आहे. जर चुकूनही यांच्या विचारांचा महापौर खुर्चीवर बसला, तर मुंबई-ठाण्याचे पूर्णपणे 'हिरवेकरण' होईल. सगळीकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा आणि 'सर तन से जुदा'चे नारे ऐकू येतील. इतकेच नाही तर, सत्ता त्यांच्या हातात गेली तर उद्या मुंबई-ठाण्यात सण-उत्सव साजरे करणेही कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.


ठाकरे गटावर दुटप्पीपणाचा आरोप करताना राणे म्हणाले, "एकीकडे संविधानाची भाषा करायची आणि दुसरीकडे बुरखेवाला महापौर करण्याची स्वप्ने पाहायची, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्हाला इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हवे आहे की शरिया कायदा लागू करायचा आहे?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.



भेंडी बाजारात बोगस मतदार शोधा


बोगस मतदारांचे पाय तोडण्याची भाषा करणाऱ्या ठाकरे बंधूंना राणे यांनी खुले आव्हान दिले. ते म्हणाले की, "जर हिंमत असेल तर आधी भेंडी बाजार, नळ बाजार आणि बेहराम पाडा यांसारख्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन उभे राहा. तिथे एकाच व्यक्तीने बुरखा घालून १५-१५ वेळा मतदान केल्याचा इतिहास आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व मनात असेल, तर तिथे जाऊन बोगस मतदान रोखून दाखवा", असे आव्हान देखील नितेश राणे यांनी दिले.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख