ठाकरे बंधूंच्या तोंडी जिहाद्यांची भाषा - मंत्री नितेश राणेंचा घणाघात; राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदान करण्याचे आवाहन

मुंबई : 'ठाकरे बंधूंची भाषा आणि जिहाद्यांच्या भाषेत आता काहीच फरक उरलेला नाही. 'व्होट जिहाद'च्या माध्यमातून हिंदू समाजाला डिवचण्याचे काम सुरू असून, राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदानातून या प्रवृत्तींना धडा शिकवावा", असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी केले.


नितेश राणे म्हणाले की, लोकसभेपासून सुरू झालेला धर्माच्या नावावर मते मागण्याचा प्रकार आता महानगरपालिका निवडणुकांपर्यंत पोहोचला आहे. जर चुकूनही यांच्या विचारांचा महापौर खुर्चीवर बसला, तर मुंबई-ठाण्याचे पूर्णपणे 'हिरवेकरण' होईल. सगळीकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा आणि 'सर तन से जुदा'चे नारे ऐकू येतील. इतकेच नाही तर, सत्ता त्यांच्या हातात गेली तर उद्या मुंबई-ठाण्यात सण-उत्सव साजरे करणेही कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.


ठाकरे गटावर दुटप्पीपणाचा आरोप करताना राणे म्हणाले, "एकीकडे संविधानाची भाषा करायची आणि दुसरीकडे बुरखेवाला महापौर करण्याची स्वप्ने पाहायची, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्हाला इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हवे आहे की शरिया कायदा लागू करायचा आहे?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.



भेंडी बाजारात बोगस मतदार शोधा


बोगस मतदारांचे पाय तोडण्याची भाषा करणाऱ्या ठाकरे बंधूंना राणे यांनी खुले आव्हान दिले. ते म्हणाले की, "जर हिंमत असेल तर आधी भेंडी बाजार, नळ बाजार आणि बेहराम पाडा यांसारख्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन उभे राहा. तिथे एकाच व्यक्तीने बुरखा घालून १५-१५ वेळा मतदान केल्याचा इतिहास आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व मनात असेल, तर तिथे जाऊन बोगस मतदान रोखून दाखवा", असे आव्हान देखील नितेश राणे यांनी दिले.

Comments
Add Comment

Ajit Pawar: अजित पवार शेवटी फोनवर काय बोलले, बारामतीतून मोठी माहिती समोर येणार

बारामती : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार