BJP New Rap Song : निवडणुकीच्या रिंगणात भाजपचं 'रॅप वॉर'! भाजपच्या रॅप साँगमध्ये ठाकरेंवर प्रहार, तर फडणवीसांचा 'धडाकेबाज' अंदाज

मातोश्रीचे 'खास' गिळत होते मुंबईकरांचा घास


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने प्रचाराचा धडाका लावला असून, आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजपने एक धमाकेदार 'रॅप साँग' लाँच केले आहे. या गाण्याच्या माध्यमातून भाजपने गेल्या २५ वर्षांतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्तेवर जोरदार प्रहार केला असून, मुंबईचा 'वनवास' आता संपणार असल्याचा दावा केला आहे.



काय आहे रॅप गाण्यात?




या रॅप साँगची सुरुवातच मुंबईकरांच्या समस्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी होते. "कधी काळी मुंबईकरांच्या तोंडाचा घास पळवला जात होता, कारण तो घास 'मातोश्री'च्या जवळचे कोणीतरी खास खात होते," अशा शब्दांत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर थेट निशाणा साधला आहे. मुंबईत बदलाची आणि विकासाची आस आता पूर्ण होणार असल्याचे या गाण्यात म्हटले आहे. या रॅपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. "देवाभाऊंनी घेतला मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास," असे म्हणत भाजपने आपल्या कार्यकाळातील मोठ्या प्रकल्पांची यादीच सादर केली आहे. यामध्ये कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, अटल सेतू, मुंबईकरांच्या हक्काची घरे (BDD चाळ पुनर्विकास) यांसारख्या 'झकास' कामांमुळेच मुंबईकरांची स्वप्ने साकार होणार असल्याचे रॅपमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.



ठाकरे सरकारवर निशाणा


गाण्याच्या शेवटी, "भाजप-महायुतीमुळे आता मुंबईकरांचा २५ वर्षांचा वनवास संपणार," असा नारा देण्यात आला आहे. या गाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुंबईचा चेहरामोहरा बदलल्याचे दाखवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ?

मुंबई : हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांत हा सण दरवर्षी १४ किंवा १५

मकर संक्रांतीचे महत्त्व सांगणारे मुलांसाठीचे भाषण

मुंबई : 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' हा प्रेमळ संदेश देत नात्यात गोडवा निर्माण करणारा हा सण. समाजातील एकतेची आणि

Ameet Satam : "अदानींची प्रगती टोचते, मग कोहिनूर स्क्वेअर कसं उभं राहिलं?" अमित साटम यांचा राज ठाकरेंना थेट सवाल

मुंबई : "ठाकरे बंधूंना अदानींच्या प्रगतीची समस्या नसून, स्वतःची 'आमदानी' कमी झाल्याचे हे दु:ख आहे. मराठी माणसाचा

BMC Election 2026 : घराबाहेर पडताय? मग आधी हे वाचा! मुंबईतील सायन, कांदिवली आणि मालाडमध्ये वाहतुकीत मोठे फेरबदल; पाहा पर्यायी मार्ग

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या

भटक्या कुत्र्यांसाठी गायक मिका सिंगची न्यायालयाला विनंती

१० एकर जमीन दान करण्याची तयारी मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू

BMC Election:बीएमसी निवडणुकीसाठी मुंबईत १,०६५ खास ‘बेस्ट’ बस सेवेत

मुंबई: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाज व्यवस्थित पार पाडावे यासाठी