महापालिकांनंतर राज्यात जिल्हा परिषदांसाठी निवडणूक


मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या निवडणुकांसाठी मतदानाच्या २४ तास आधी प्रचार थांबेल असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.



सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या बारा जिल्हा परिषदा (Zilla Parishad) आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला सोमवारी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची घोषणा केली आहे. उर्वरीत जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.




जिल्हा परिषद निवडणूक १२ जिल्ह्यांमध्ये होणार


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, परभणी


या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी दोन मतं द्यावी लागतील. निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत त्या जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग एक जुलै २०२५ ची मतदार यादी वापरणार आहे. निवडणूक आयोगाने एक जुलै २०२५ ची मतदार यादी अंतिम स्वरुपात ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे.


राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र असतील. एकूण २.०९ कोटी मतदार मतदान करतील, त्यातील १.०२ कोटी महिला मतदार आहेत. एकूण बारा जिल्हा परिषदांसाठी ४३१ सदस्य निवडून द्यायचे आहेत.


जिल्हा परिषदांसोबतच १२५ पंचायत समित्यांसाठी १४६२ सदस्यांची निवडणूक घेण्यात येईल. त्यातील ४३१ जागा महिलांसाठी, १६६ जागा अनुसुचित जातींसाठी आणि ३८ जागा अनुसुचित जमातींसाठी राखीव असतील. मागास प्रवर्गासाठी ३४२ जागा राखीव असतील.






महाराष्ट्र : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम २०२६


उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : १६ ते २१ जानेवारी


अर्ज छाननी : २२ जानेवारी


अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २७ जानेवारी, दुपारी ३ पर्यंत


अंतिम उमेदवार यादी, चिन्ह वाटप : २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतर


मतदान : ५ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०


मतमोजणी, निकाल : ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० पासून


महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे.



Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला