अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या ३१ नगरसेवकांना व्हीप

अंबरनाथ : अंबरनाथ विकास आघाडीकडून सर्व ३१ नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला असून, व्हीपचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शिवसेना (शिंदे गट)ला मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथ विकास आघाडीचे गटनेते अभिजीत करंजुलेकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत या व्हीपबाबत स्पष्ट भूमिका मांडली.


“आम्ही सर्व ३१ नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंबरनाथ विकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करावे लागेल. व्हीपविरोधात मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.


अंबरनाथ नगर परिषदेत एकूण ५९ नगरसेवक आहेत. यापैकी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून निलंबित करण्यात आले होते आणि पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे १४, काँग्रेसचे १२ (भाजपमध्ये प्रवेश केलेले), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ४ आणि १ अपक्ष अशा एकूण ३१ नगरसेवकांनी मिळून ‘अंबरनाथ विकास आघाडी’ या नावाने जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र गटाची नोंदणी केली होती.

Comments
Add Comment

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक