अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या ३१ नगरसेवकांना व्हीप

अंबरनाथ : अंबरनाथ विकास आघाडीकडून सर्व ३१ नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला असून, व्हीपचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शिवसेना (शिंदे गट)ला मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथ विकास आघाडीचे गटनेते अभिजीत करंजुलेकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत या व्हीपबाबत स्पष्ट भूमिका मांडली.


“आम्ही सर्व ३१ नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंबरनाथ विकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करावे लागेल. व्हीपविरोधात मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.


अंबरनाथ नगर परिषदेत एकूण ५९ नगरसेवक आहेत. यापैकी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून निलंबित करण्यात आले होते आणि पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे १४, काँग्रेसचे १२ (भाजपमध्ये प्रवेश केलेले), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ४ आणि १ अपक्ष अशा एकूण ३१ नगरसेवकांनी मिळून ‘अंबरनाथ विकास आघाडी’ या नावाने जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र गटाची नोंदणी केली होती.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये