संत ज्ञानेश्वर

आणि इच्छिलिया सांगडे
आणि इच्छिलिया सांगडे |
इंद्रिया आमिष न जोडे |
ऐसा जो ठावे पडे |
तोचि द्वेषु || ज्ञानेश्र्वरी : १३-२६


मनातल्या इच्छेप्रमाणे इंद्रियांना हवी असलेली बाब मिळाली नाही वा ती इतरांना प्राप्त झाली, तर जी मनोवृत्ती प्रकट होते, तिला द्वेष असे म्हणतात. मानवी आयुष्यातील षडरिपुंपैकी द्वेष हा एक रिपू आहे.


एका सुभाषितात वर्णन केल्याप्रमाणे भटजी, ज्योतिषी, वेश्या, कुत्रा, कोंबडा, भिकारी, अभिनेता आणि मंत्री हे एकमेकांचा द्वेष करतात. तसेच दोन स्त्रियांचेही एकमेकींशी पटत नाही. दोघी जर एकमेकींच्या सवती असतील तर दोघींमधला सवतीमत्सर पुराण काळापासून प्रसिद्ध आहे.


द्वेष वा मत्सर हा माणसाला काहीच फायदा करून देत नाही. उलट नुकसानच करतो. म्हणूनच 'कुणाही जीवाचा न घडो मत्सर' असे संत सांगतात. संतांच्या अतःकरणात भक्तिचे तरंग असतात. तिथे मत्सर नावाची भावना जराही आढळत नाही. संत ज्ञानेश्र्वर हणतात,


आपणचि विश्व जाहला । तरी भेदभावो सहजचि गेला ।
म्हणोनि द्वेष ठेला । जया पुरुषा ।
ज्ञानेश्र्वरी : १२-१९१


जो स्वतःच विश्वात्मक झाला तो कोणाचा द्वेष कसा करणार? द्वेषातून फक्त द्वेषच निर्माण होतो. म्हणून द्वेषाचे मूळ पूर्णपणे वेळीच संपविले पाहिजे, हा संतविचारांचा गाभा आहे.


पण संतांच्या वाटेवर अडचणी निर्माण करणे हा काही लोकांचा स्वभावधर्मच असतो. संत तुकारामांनी एका अभंगात म्हटल्याप्रमाणे हरिरण, मासा आणि संतसज्जन हे आपापल्या ठिकाणी असतात. हरिण गवत खाते, मासा पाण्यात क्रीडा करतो तर संत संज्जन आपल्या नामस्मरणात समाधानाने रहात असतात. पण पारधी हरणाची शिकार करतो. कोळी माशाला जाळ्यात पकडतो आणि दुष्टदुर्जन लोक सज्जनांशी विनाकारण वैर करुन त्यांना त्रास देतात.


खरं तर मत्सर करणारा स्वतःच आपले नुकसान करून घेतो. पण काजव्याने सूर्याचा मत्सर केला, तर सूर्याला काही फरक पडत नाही. काजव्याचीच वेळ, शक्ती आणि विचारशक्ती वाया जाते. टिटवीने समुद्राचा द्वेष केला तर समुद्राला काय फरक पडतो? पतंगाने दिव्याचा द्वेष केला तर दिव्याचे काय नुकसान? नुकसान पतंगाचेच आहे, मनात द्वेष भावना असेल तर मनाला शांती लाभत नाही. म्हणूनच संत सांगतात,की मत्सर, द्वेष या भावना मनातून काढून टाका. मग मनाला निरामय भक्तीचा अनुभव देईल.


- डॉ. देवीदास पोटे


Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन