राज ठाकरे यांना अजूनही काही नेते सोडून जाण्याची भीती, जाहीर सभेत बोलून दाखवले हे शब्द..

 




मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी पुढे कोण सोबत राहील आणि कोण सोडून जाईल याची भीती त्यांना आजही सतावत आहेत. आज मनसे आणि उबाठा यांची युती झाल्याने अनेक नाराज झाले आणि पक्ष सोडून गेले. त्या पक्ष सोडून गेलेल्यांची राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपलेच आहेत,परत येतील, असे सांगतानाच राज ठाकरे यांनी आता जे आहेत ते कुठे जातील ते माहित नाही, असे सांगत भविष्यात सोबत असणारेही सोडून जातील अशीच अप्रत्यक्ष भीती व्यक्त केली.


उबाठा, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई महापालिका निवडणुकीची जाहीर सभा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यावर आवाज उठवल्याबद्दल अनेक सामाजिक संस्था आहे, त्यांचे नेते. वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्र यांचे संपादक तसेच पत्रकार यांचे आभार मानले. २० वर्षानंतर प्रथमच मी युती करतो. युतीच्या प्रोसेसमध्ये अनेकांची मने दुखावली गेली. अनेक नाराज झाले, काहींना वाईट वाटले ते दुसऱ्या पक्षात गेले. पण आमच्याही हातात नसतात या गोष्टी. त्यांना दुखावणे हा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे मी त्याची, दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत त्यांनी एकप्रकारे माफी मागितली. जे सोडून गेले ते आपलेच आहेत. परत येतील. आता आहेत ते कुठे जातील तेही माहित नाही, त्यांना समजू शकतो,असे सांगत एकप्रकारे राज ठाकरे यांनी भिती व्यक्त केली.

मागील काही दिवसात, स्नेहल जाधव,राजा चौगुले, संतोष धुरी, संतोष नलावडे, ढवळे, आदी पक्ष सोडून गेले असून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हेही नाराज असून तेही पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच जाहीर सभेत देशपांडे यांना भाषण करण्याची संधी दिली. आणि देशपांडे व्यासपीठावर असताना राज ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे देशपांडे यांनाच उद्देशून अप्रत्यक्ष तर बोलले नाही ना असा प्रश्न मनसैनिक आणि उबाठाच्या शिवसैनिकांना पडला आहे.
Comments
Add Comment

किल्ले सिंधुदुर्गवरील श्री शिवराजेश्वर मंदिराच्या अनुदानात ५५ वर्षांनी वाढ

महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; वार्षिक ३ हजारांऐवजी आता मिळणार थेट १ लाख रुपये मुंबई : हिंदवी स्वराज्याचे

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी

Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर यापुढे कोणतीही चर्चा नाही

शशिकांत शिंदे; आमच्यासाठी विषय संपला मुंबई : गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत असलेल्या

Agriculture Minister Dattatreya Bharane : शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा अडथळा नाही

 कृषिमंत्री दत्तात्रय भरणे; ३० जूनपूर्वी घोषणा होणार मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर

Devendra Fadnavis : महाराष्ट्र करणार अणुऊर्जा क्षेत्रात देशाचे नेतृत्व

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा

Iran - America War : इराणला आर्थिक धक्का; अमेरिकेने परकीय चलन नेटवर्कवर टाकला फास; परकीय चलन कंपनी आणि १९ जहाजांवर निर्बंध

अमेरिकेने इराणविरोधातील आर्थिक कारवाई आणखी तीव्र करत मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन प्रशासनाने नव्या