मराठी माणसांचे महत्व मुंबईत कधीही कमी होणार नाही

दिशाभूल करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या खोटेपणाचा घेतला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाचार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे हित जोपासणारा हा मराठी माणूस आहे. हा एकनाथ शिंदे मराठी नाही का? हे देवेंद्र फडणवीस मराठी नाही का? मराठी माणसांचे महत्व मुंबईत कधीही कमी होणार नाही. महापौर हा महायुतीचाच असेल आणि मराठीच असेल असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईवर भगवा फडकणारच आणि तोही महायुतीचा भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यांचे दिवसभर नेटफ्लिकस आणि फावल्या वेळात पॉलिटिक्स अशा शब्दात जोरकस टीका ठाकरे बंधूंवर केली.





दादर छत्रपती महाराज मैदानात महायुतीच्या निवडणूक जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ही सभा त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी नाही. पण मराठी माणसांसाठी त्यांनी काय यापेक्षा आम्ही काय केले हे आम्ही सांगतो. आम्ही महायुतीच्या सरकारने २० हजार इमारतीना ओसी देण्याचे काम केले... पागडीमुक्त मुंबई करण्याचा. निर्णय महायुतीन सरकारने घेतला. झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी १७ ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांना मंजुरी दिली. खड्डेमुक्त मुंबई करण्याचे काम आम्ही केले. पुढील वर्षात मुंबई खड्डे मुक्त दिसेल. यासाठी दोन टप्प्यात सिमेंट काँक्रीटकरणची कामे दोन टप्प्यात सुरू आहेत. अशी विविध कामांची जंत्री वाचून दाखवत एकनाथ शिंदे यांनी आम्ही स्वत:ची घरे भरणारे नाही आहोत, तर लोकांना घरे देणारे आहोत असे निक्षून सांगितले.


आधी कामे सुरु होती, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यांनंतर त्यांनी कामात स्पीडब्रेकर निर्माण केले. मेट्रो तीन प्रकल्प आधी अडकवला, तो स्पीड ब्रेकर आम्ही मुख्यमंत्री झाल्यावर हटवला. जिथे जिथे प्रकल्प कामात गतिरोधक निर्माण केले होते ते आम्ही हटवले आणि प्रकल्प कामांना गती दिली.पण यांनी प्रकल्प अडवल्याने तब्बल दहा हजार कोटींचा प्रकल्प खर्च वाढला. हा पैसा तुमचा
होता असे सांगत रखडलेल्या प्रकल्प कामामुळे कसा तिजोरीवर उद्धव ठाकरेंमुळे बोजा पडला याचा पाडा वाचला.


मुंबईतील एक लाख गिरणी कामगारंना मुंबई महानगरात परिसरात घर देणार असे स्वागत बंगल्यात राहणाऱ्यांना झोपडीधारकांचे दुःख काय करणार असा सवाल केला. आम्ही पोटतिडकीने काम करतो, आम्ही ऑनफिल्ड काम करणारे आहोत, तुम्ही घरी बसणारे आहात. तुम्हाला सर्वसामान्यांच्या वेदना काय करणार असा सवाल केला.


हे स्वार्थासाठी आधी वेगळे झाले आणि स्वार्थासाठी आता एकत्र आले अशा शब्दात ठाकरे बंधूंच्या युतीचा समाचार घेतलं. आम्ही आयत्या बिळावरचे नेते नाही आहोत. तर आम्ही कार्य करून मोठे झाले आहोत. आम्ही मंत्रीपद सोडून गेले, सत्तेवर पाणी सोडून गेलो, आम्ही युतीचे गठबंधन करून सरकार स्थापन केले., त्यांनी करून दाखवलं नाही तर खाऊन दाखवलं असे सांगत ठाकरेंचा समाचार घेतला.


Comments
Add Comment

Russia-China Conflict : रशियाकडून चिनी मालवाहू जहाजावर हल्ल्याचा युक्रेनचा दावा; आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

जगभरात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. युक्रेनने गंभीर आरोप करत दावा केला आहे की, रशियन ड्रोन हल्ल्यात

Bread Prices Rise In Mumbai : मुंबईकरांच्या खिशाला आणखी एक कात्री; ब्रेडच्या दरात तब्बल ५ रुपयांची वाढ!

मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी एक मोठी कात्री लागली आहे. आधीच दूध आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या

Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे

Pune Bastian Club : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पुण्यातील 'बॅस्टियन' क्लबमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील नाईटलाइफ (Video Viral On Social Media) आणि पब संस्कृती पुन्हा एकदा एका मोठ्या

Prashant Kishor : प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे राजकीय सल्लागार?

- सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्यासोबत बैठक; १ जूनपासून काम सुरू करणार मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर

Share Market : शेअर बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ३०० अंकांच्या जवळ, निफ्टीही वधारला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही देशांतर्गत शेअर बाजाराने मंगळवारी