पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर होणार, २८ जानेवारी रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होणार

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी १ फेब्रुवारी रोजीच सादर होणार असल्याचे स्षष्ट केले.यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. संसदेच्या पटलावर त्या आठव्यांदा अर्थसंकल्प ठेवणार आहेत. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेश हे २८ जानेवारी आणि २ एप्रिल दरम्यान दोन सत्रात होणार आहे.
केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजीजू यांनी याबाबतचा निर्णय सोशल मीडियावर शेअर केला. ते म्हणाले, 'भारत सरकारच्या शिफरसीनुसार भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ साठी दोन्ही सभागृहांचे सत्र भरवण्याची परवानगी दिली आहे. हे सत्र २८ जानेवारी रोजी सुरू होईल आणि पहिले सत्र १३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर दुसरे सत्र हे ९ मार्च रोजी सुरू होईल आणि २ एप्रिल रोजी संपेल. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाळी अधिवेशन आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होते.

Comments
Add Comment

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे